शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

वाढत्या उन्हाचा पशू-पक्ष्यांवर परिणाम

By admin | Updated: April 6, 2017 02:46 IST

गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला

दासगाव : गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत सोमवारी भरदुपारच्या वेळी कोकिळा पक्षी मृत अवस्थेत सापडला. तर याच परिसरात अनेक पक्षी अस्वस्थ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तर जंगल भागातील माकडांनी मानवी वस्तीत प्रवेश के ला आहे.गेल्या अठवडाभरापासून उष्णतेचा पारा चढला आहे, तर पाण्याची चणचणदेखील भासू लागली आहे. जंगल आणि उंच भागांतील पाणीसाठा वाढत्या उन्हामुळे संपुष्टात आल्याने प्राणीमात्रांना पाण्यासाठी नागरी वस्तीकडे वळण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड शहर परिसरातील रायगड रस्ता, केंबुर्ली, दासगाव, टोेळ, दाभोळ भागाजवळ असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे वानर वावरताना दिसून येत आहेत. जंगलांमध्ये आंबा, काजूच्या पिकांचा मोसम असताना केवळ पाण्याच्या शोधातच हे वानर जंगलाबाहेर पडले असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त के लाआहे. जंगली वानरांची पाण्यासाठी नागरीवस्तीकडे वाटचाल सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गालगतच केंबुर्ली गाव परिसरात कोकिळा पक्षी मृत्यू अवस्थेत सापडला आहे. केंबुर्ली गाव परिसरात पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा गेल्या दोन महिन्यांपासून असल्यामुळे या पक्ष्याचा पाणी न मिळाल्यामुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. चिमणी, कावळा आणि कोकिळा या पक्ष्यांना पाण्याची अधिक गरज असते, वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून मृत्यू होतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे चक्कर येऊन पडून मृत्यू होतो. तरी नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनीके ले आहे. (वार्ताहर) नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनी के ले आहे.