शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

वाढत्या उन्हाचा पशू-पक्ष्यांवर परिणाम

By admin | Updated: April 6, 2017 02:46 IST

गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला

दासगाव : गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत सोमवारी भरदुपारच्या वेळी कोकिळा पक्षी मृत अवस्थेत सापडला. तर याच परिसरात अनेक पक्षी अस्वस्थ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तर जंगल भागातील माकडांनी मानवी वस्तीत प्रवेश के ला आहे.गेल्या अठवडाभरापासून उष्णतेचा पारा चढला आहे, तर पाण्याची चणचणदेखील भासू लागली आहे. जंगल आणि उंच भागांतील पाणीसाठा वाढत्या उन्हामुळे संपुष्टात आल्याने प्राणीमात्रांना पाण्यासाठी नागरी वस्तीकडे वळण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड शहर परिसरातील रायगड रस्ता, केंबुर्ली, दासगाव, टोेळ, दाभोळ भागाजवळ असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे वानर वावरताना दिसून येत आहेत. जंगलांमध्ये आंबा, काजूच्या पिकांचा मोसम असताना केवळ पाण्याच्या शोधातच हे वानर जंगलाबाहेर पडले असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त के लाआहे. जंगली वानरांची पाण्यासाठी नागरीवस्तीकडे वाटचाल सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गालगतच केंबुर्ली गाव परिसरात कोकिळा पक्षी मृत्यू अवस्थेत सापडला आहे. केंबुर्ली गाव परिसरात पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा गेल्या दोन महिन्यांपासून असल्यामुळे या पक्ष्याचा पाणी न मिळाल्यामुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. चिमणी, कावळा आणि कोकिळा या पक्ष्यांना पाण्याची अधिक गरज असते, वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून मृत्यू होतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे चक्कर येऊन पडून मृत्यू होतो. तरी नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनीके ले आहे. (वार्ताहर) नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनी के ले आहे.