शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

वाढत्या उन्हाचा पशू-पक्ष्यांवर परिणाम

By admin | Updated: April 6, 2017 02:46 IST

गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला

दासगाव : गेल्या आठवडाभरापासून महाड तालुक्यातील तापमानाचा पारा चढला असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतानाच पक्षी आणि प्राण्यांवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत सोमवारी भरदुपारच्या वेळी कोकिळा पक्षी मृत अवस्थेत सापडला. तर याच परिसरात अनेक पक्षी अस्वस्थ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तर जंगल भागातील माकडांनी मानवी वस्तीत प्रवेश के ला आहे.गेल्या अठवडाभरापासून उष्णतेचा पारा चढला आहे, तर पाण्याची चणचणदेखील भासू लागली आहे. जंगल आणि उंच भागांतील पाणीसाठा वाढत्या उन्हामुळे संपुष्टात आल्याने प्राणीमात्रांना पाण्यासाठी नागरी वस्तीकडे वळण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाड शहर परिसरातील रायगड रस्ता, केंबुर्ली, दासगाव, टोेळ, दाभोळ भागाजवळ असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे वानर वावरताना दिसून येत आहेत. जंगलांमध्ये आंबा, काजूच्या पिकांचा मोसम असताना केवळ पाण्याच्या शोधातच हे वानर जंगलाबाहेर पडले असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त के लाआहे. जंगली वानरांची पाण्यासाठी नागरीवस्तीकडे वाटचाल सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गालगतच केंबुर्ली गाव परिसरात कोकिळा पक्षी मृत्यू अवस्थेत सापडला आहे. केंबुर्ली गाव परिसरात पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा गेल्या दोन महिन्यांपासून असल्यामुळे या पक्ष्याचा पाणी न मिळाल्यामुळेच मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. चिमणी, कावळा आणि कोकिळा या पक्ष्यांना पाण्याची अधिक गरज असते, वेळीच पाणी मिळाले नाही तर उडता उडता त्यांच्या शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन खाली पडून मृत्यू होतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. नैसर्गिक पाणीपुरवठा आटतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे चक्कर येऊन पडून मृत्यू होतो. तरी नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनीके ले आहे. (वार्ताहर) नागरिकांनी आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी एखादी पाण्याची वाटी भरून ठेवावी, असे आवाहन बिरवाडी येथील सफर कें द्राचे संचालक गणराज जैन यांनी के ले आहे.