शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

काँग्रेस गेली आयसीयूमध्ये!

By admin | Updated: May 17, 2014 04:41 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्‍यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला,

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्‍यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला, अनधिकृत घरांच्या बाबतीत निर्णय घेतले, मात्र यातली एकही बाब काँग्रेसच्या मदतीला आली नाही. देशाला १७ खासदार देणार्‍या काँग्रेसच्या वाट्याला या निवडणुकीत अवघे दोन खासदार आले, एवढा दारुण पराभव काँग्रेसचा या आधीही कधी झाला नव्हता. गुजरातपेक्षा महाराष्टÑ अनेक गोष्टींवर आघाडीवर असताना, राज्यात आजपर्यंत झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे मिळालेले यश, प्रामाणिक मुख्यमंत्री अशी प्रतिमा, मुंबईत पायाभूत सोयीसुविधांचे उभे केलेले जाळे, भ्रष्टाचारात लिप्त असणारे मंत्री राष्टÑवादीचे आहेत, काँग्रेसचा त्याच्याशी संबंध नाही असे चित्र निर्माण करण्यात आलेले यश, एवढ्या जमेच्या बाजू असताना देखील काँग्रेसचा न भूतो न भविष्यती असा पराभव राज्यात का झाला? या प्रश्नाने प्रत्येक काँग्रेस नेत्याला भंडावून सोडलेले आहे. दुसर्‍याकडे असे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटे येतात याचा मात्र याच नेत्यांना सोयीस्कर विसर पडला. साध्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नेमणुका देखील केल्या नाहीत, विविध महामंडळांवर पदाधिकारी नाहीत, इथपासून ते कार्यकर्त्यांची छोटी छोटी कामे होईनाशी झाली. मुख्यमंत्र्यांकडे फायली पडून असतात, वेळेवर निर्णय होत नाहीत, या सातत्याने होणार्‍या आरोपाचे खंडन करता आले नाही.