शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

काँग्रेसचे 150 उमेदवार ठरले

By admin | Updated: September 3, 2014 03:04 IST

आपल्या कोटय़ातील 174पैकी 150 जागांवर काँग्रेसने उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत.

यदु जोशी - मुंबई 
आपल्या कोटय़ातील 174पैकी 150 जागांवर काँग्रेसने उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. उमेदवारांची नावे नक्की करताना जिंकून येण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे. गेले आठ दिवस प्रदेश काँग्रेसच्या निवड समितीने मॅरेथॉन चर्चा करून उमेदवारांची नावे ठरविली. 
आजवरचा अनुभव असा आहे की प्रदेश निवड समितीने ठरवून वर पाठविलेली बहुतेक नावे कायम राहतात; झाले तरी अपवादात्मक बदल होतात. प्रदेश निवड मंडळाकडून आलेली नावे बघून छाननी समिती अंतिम यादी तयार करते. राज्याकडून एकेकच नाव आले असेल तर त्यात एखाद-दुसरे नाव सुचविण्याचा अधिकार या समितीला आहे. नंतर छाननी समिती ही यादी केंद्रीय निवड मंडळाकडे पाठवेल. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने निश्चित केलेली यादी अंतिम असेल. 
पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिका:याने लोकमतला सांगितले की, प्रदेश निवड मंडळाने ठरविलेली नावे येत्या दोन दिवसांत केंद्रीय छाननी समितीकडे पाठविण्यात येतील. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकाजरुन खरगे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
प्रदेश निवड मंडळाने 15क् मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असतील याबाबतची मानसिकता तयार केली आहे. निवड मंडळातील एखाद्या नेत्याचा आग्रह किंवा त्या मतदारसंघात बंडखोरी होऊ नये म्हणून काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नावे पाठविण्यात आली असली तरी उमेदवारी कोणाला द्यायची हे नक्की झाले आहे.
बंडखोरी होऊ नये म्हणून पॅनेलमध्ये नाव ठेवल्याचीही काही उदाहरणो आहेत. विधानसभा निवडणुकीत 12-15 हजार मते स्वबळावर घेण्याची क्षमता असलेला इच्छुकही महत्त्वाचा असतो. पण उमेदवारी दुस:याला द्यायची असेल तर त्याला दुखवून चालत नाही. अशावेळी त्याला गोंजारण्यासाठी पॅनेलमध्ये नाव पाठवावे लागते. तसे याहीवेळी काही मतदारसंघांबाबत करण्यात आले आहे.  
 
मुख्यमंत्री समर्थकांचे काय?
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी. 
 
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी. 
 
ऐनवेळी येऊ शकेल नाव
काही मतदारसंघांसाठी एकेकच उमेदवाराचे नाव वर पाठविण्यात येणार आहे. अर्थात तसे झाले म्हणजे उमेदवारी त्यालाच मिळणार, असे समजण्याचे कारण नाही. केंद्रीय छाननी समिती किंवा केंद्रीय निवड मंडळाच्या पातळीवर एखादे नाव जोडले जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रंनी स्पष्ट केले. विदर्भातील ब्रrापुरीमध्ये 2क्क्9ला निवड मंडळाने संदीप गड्डमवार यांचे नाव पाठविले; पण दिल्लीतून राहुल ब्रिगेडचे सदस्य पंकज गुड्डेवार यांना संधी मिळाली होती.