यदु जोशी - मुंबई
आपल्या कोटय़ातील 174पैकी 150 जागांवर काँग्रेसने उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. उमेदवारांची नावे नक्की करताना जिंकून येण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे. गेले आठ दिवस प्रदेश काँग्रेसच्या निवड समितीने मॅरेथॉन चर्चा करून उमेदवारांची नावे ठरविली.
आजवरचा अनुभव असा आहे की प्रदेश निवड समितीने ठरवून वर पाठविलेली बहुतेक नावे कायम राहतात; झाले तरी अपवादात्मक बदल होतात. प्रदेश निवड मंडळाकडून आलेली नावे बघून छाननी समिती अंतिम यादी तयार करते. राज्याकडून एकेकच नाव आले असेल तर त्यात एखाद-दुसरे नाव सुचविण्याचा अधिकार या समितीला आहे. नंतर छाननी समिती ही यादी केंद्रीय निवड मंडळाकडे पाठवेल. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने निश्चित केलेली यादी अंतिम असेल.
पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिका:याने लोकमतला सांगितले की, प्रदेश निवड मंडळाने ठरविलेली नावे येत्या दोन दिवसांत केंद्रीय छाननी समितीकडे पाठविण्यात येतील. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकाजरुन खरगे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
प्रदेश निवड मंडळाने 15क् मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असतील याबाबतची मानसिकता तयार केली आहे. निवड मंडळातील एखाद्या नेत्याचा आग्रह किंवा त्या मतदारसंघात बंडखोरी होऊ नये म्हणून काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नावे पाठविण्यात आली असली तरी उमेदवारी कोणाला द्यायची हे नक्की झाले आहे.
बंडखोरी होऊ नये म्हणून पॅनेलमध्ये नाव ठेवल्याचीही काही उदाहरणो आहेत. विधानसभा निवडणुकीत 12-15 हजार मते स्वबळावर घेण्याची क्षमता असलेला इच्छुकही महत्त्वाचा असतो. पण उमेदवारी दुस:याला द्यायची असेल तर त्याला दुखवून चालत नाही. अशावेळी त्याला गोंजारण्यासाठी पॅनेलमध्ये नाव पाठवावे लागते. तसे याहीवेळी काही मतदारसंघांबाबत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री समर्थकांचे काय?
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी.
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी.
ऐनवेळी येऊ शकेल नाव
काही मतदारसंघांसाठी एकेकच उमेदवाराचे नाव वर पाठविण्यात येणार आहे. अर्थात तसे झाले म्हणजे उमेदवारी त्यालाच मिळणार, असे समजण्याचे कारण नाही. केंद्रीय छाननी समिती किंवा केंद्रीय निवड मंडळाच्या पातळीवर एखादे नाव जोडले जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रंनी स्पष्ट केले. विदर्भातील ब्रrापुरीमध्ये 2क्क्9ला निवड मंडळाने संदीप गड्डमवार यांचे नाव पाठविले; पण दिल्लीतून राहुल ब्रिगेडचे सदस्य पंकज गुड्डेवार यांना संधी मिळाली होती.