कोल्हापूर : केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा पर्दाफाश करणारे आंदोलन काँग्रेसतर्फे येत्या शनिवारपासून राज्यभर सुरू करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली. या आंदोलनातून भाजपाचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथे राजीव गांधी सद्भावना दौडच्यानिमित्ताने आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभर दुष्काळाचे गडद सावट असताना त्याबद्दल कोणत्याच उपाययोजना न करता हाताची घडी घालून बसलेल्या सरकारवर त्यांनी टीकेची तोफ डागली.मंगळवारपर्यंत करण्यात येणाऱ्या या आंदोलनात आम्ही मेळावे, सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रसारमाध्यमांशी संवाद या माध्यमातून भाजपाच्या धोरणांचा पर्दाफाश करू. संसदेचे अधिवेशन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चालवू दिले नाही म्हणून भाजपाने प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात आंदोलन सुरू केले आहे. त्यास प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेस करेल, असे ते म्हणाले.मुदतपूर्व निवडणुकांची शक्यताकेंद्र आणि राज्यातील सरकार ज्याप्रमाणे हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेत आहे, त्याचा विचार केल्यास मुदतपूर्व निवडणुका लागणार असल्याचे भाकीत अशोक चव्हाण यांनी केले. दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे उद्यापासून ‘पर्दाफाश आंदोलन’
By admin | Updated: August 21, 2015 00:52 IST