शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: October 6, 2015 03:37 IST

राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जाहिरातबाजी, सेलिब्रेशनसाठीच देवेंद्र फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

मुंबई : राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जाहिरातबाजी, सेलिब्रेशनसाठीच देवेंद्र फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे आझाद मैदान येथे आयोजित बैलगाडी मोर्चावेळी चव्हाण बोलत होते. शेतकऱ्यांच्या नावाखाली करवाढ करणाऱ्यांनी केंद्रातून शेतकऱ्यांसाठी निधी का आणला नाही, असा सवालही चव्हाण यांनी या वेळी केला. राज्य शासनाने नुकताच पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर २ रुपयांचा अधिभार लावत इंधन दरवाढीचा निर्णय केला. या निर्णयाविरोधात अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बैलगाडी आंदोलन केले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, सर्वसामान्य जनता आधीच भाववाढीमुळे त्रस्त आहे. अशा वेळी पेट्रोल आणि डिझेलवरील दरवाढ सर्वसामान्यांना आणखी अडचणीत आणणारी असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली. भाजपा सरकारच्या कामकाजाची पद्धत पाहिली तर ही करवाढ राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या जाहिरतबाजीसाठी असल्याचे दिसून येते. ३१ आॅक्टोबरला राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या दिवशी आपल्या तथाकथित कामगिरीचा ढोल बडविण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणार आहे. या जाहिरातीचा खर्च भरून काढण्यासाठी इंधन दरवाढ केलेली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला. ‘अच्छे दिन’ गेले कुठे?भाजपाने निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिना’चे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात वाढती महागाई व पंतप्रधानांचे वाढते परदेश दौरेच जनतेला पाहावे लागत आहेत. रेल्वे-बस भाडेवाढ, पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि बेरोजगारीच जनतेच्या वाट्याला आल्याचे निरुपम म्हणाले.