शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: December 9, 2014 02:26 IST

कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने या मुद्यावर विधान परिषदेत आक्रमक धोरण अवलंबिले.

नागपूर : कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने या मुद्यावर विधान परिषदेत आक्रमक धोरण अवलंबिले. संतप्त सदस्यांनी सभागृहात सरकार विरोधात घोषणा दिल्या. महसूलमंत्री एकनाथ खडसे व काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.
सकाळी 11 वाजता पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राजेंद्र मुळक, संजय दत्त यांच्यासह इतरही सदस्यांनी सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घेण्याची मागणी  केली. राज्यात दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र सरकार त्यांच्या मदतीसाठी कोणतेही पाऊल उचलत नाही. पॅकेज जाहीर करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
यासंदर्भात निवेदन करताना सभापती  म्हणाले की,  कामकाज पत्रिकेवर शोकप्रस्ताव आहे. राष्ट्रवादीनेही या प्रश्नावर औचित्याच्या मुद्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे सभागृहाचे मत घेतल्यावरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
ठाकरे यांनी स्थगन दिल्याने त्यांना त्यावर मत मांडण्यास सभापतींनी परवानगी दिली. पण शेकापचे जयंत पाटील यांनी त्यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहाचा पहिला दिवस असल्याने मंत्र्यांचा परिचय, शोक प्रस्ताव हे कामकाज पत्रिकेवरील विषय झाल्यावर शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्यावी, शोक प्रस्ताव बाजूला ठेवून चर्चेला परवानगी दिल्यास चुकीचे संकेत निर्माण होतील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनीही याला दुजोरा दिला. मात्र काँग्रेसचे सदस्य चर्चेच्या मुद्यावर आग्रही होते. शोक प्रस्तावावरच चर्चा करायची असेल तर प्रथम शेतक:यांच्या आत्महत्येचाही शोक प्रस्ताव आणा, असे काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले. 
सरकारची बाजू मांडताना एकनाथ खडसे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज हे नियमानुसारच चालायला हवे, त्यामुळे कामकाज पत्रिकेवर जे विषय आहे त्यानुसार पुढचे कामकाज घ्यावे,
यावर काँग्रेसचे सदस्य संतापले ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ अशा सरकारचा निषेध करणा:या घोषणा त्यांनी दिल्या. सभागृहात एकच गदारोळ झाला. सर्व  सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर सभापतींनी नियम 2क्7 नुसार चर्चा करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर अध्र्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळला 
 संकटग्रस्त शेतक:यांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेसने नियम 57 अंतर्गत मांडलेला प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार मंत्र्यांचा परिचय व शोकप्रस्ताव घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील वारंवार मागणी करीत राहिले पण अध्यक्षांनी त्यांची दखल घेतली नाही.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, दीड महिन्यात दोन हजार आत्महत्या झाल्या. अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी रविवारी तब्बल 57 शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत. कापसाला भाव मिळालेला नाही. सोयीबीन हातून गेले आहे. संकटात सापडलेल्या शेतक:याला सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी त्यांनी केली. विखे पाटील मागणी करीत असतानाच अध्यक्षांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांचा परिचय करून देऊ लागले. 
 
शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेसने दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारायचा किंवा नाही याबाबत सभागृहात चर्चा सुरू असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे व विरोधी बाकावरील काँग्रेस सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. शेतक:यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर आहे, यावर चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र काँग्रेसने दिलेला प्रस्ताव हा नियम 289 मध्ये बसणारा नाही, असे खडसे म्हणताच काँग्रेसचे सदस्य संतापले व त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे खडसे संतापले. 
 
तालिका अध्यक्ष जाहीर
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तालिका अध्यक्ष म्हणून शिवाजीराव नाईक, योगेश सागर, विजय अवटे, वर्षा गायकवाड, दिलीप सोपल यांच्या नावांची घोषणा केली.