शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

विरोधकांच्या प्रस्तावात परस्पर काटछाट

By admin | Updated: December 18, 2015 02:43 IST

विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे

नागपूर : विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे हे देखील आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल विरोधकांनी केला मात्र त्यात म्हणावी तशी तीव्रता नव्हती. त्यातून सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला खरा, पण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.गुरुवारचा दिवस विरोधकांचा असतो. त्यादिवशी विरोधक त्यांना हवा तो प्रस्ताव मांडतात. त्यानुसार राधाकृष्ण विखे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम या बड्या नेत्यांनी एकत्रितपणे विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा वाढता अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचन प्रकल्पांना मान्यता न मिळणे असा विषय चर्चेला आणला होता. त्यासोबतच गोसीखुर्द. बेंबळा, लोअर वर्धा, अप्पर वर्धासारखे प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नसल्याचा विषयही चर्चेला दिला होता. मात्र सकाळी कामकाज पत्रिका पाहून विरोधकांना धक्काच बसला. आपण दिलेल्या प्रस्तावात काटछाट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणाला विचारून हे केले गेले याची शहानिशा झाली; पण कोणालाच विचारले गेले नाही हे लक्षात येताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय थेट सभागृहात काढला. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे देखील यावर संतप्त झाले. आम्हाला न सांगता परस्पर विरोधकांच्या प्रस्तावात अशी काटछाट होते कशी?, असे होत असेल तर या कामकाजाला अर्थ तरी काय उरला असा थेट सवाल अजित पवार यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केला. तर विरोधकांनी काय बोलायचे आणि काय नाही हे सरकार ठरवणार आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अध्यक्ष बागडे यांनी, तीन-चार विभागांचा समावेश असल्याने काही विभाग व चर्चेत येऊन गेलेले विषय वगळले असतील. विरोधकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल, पण तो झाला नसेल. पण तुम्ही तुमच्या विषयावर बोला असे सांगूून चर्चा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला.शेवटी शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी जे विषय वगळले आहेत त्यातले कोणते घ्यायचे आणि कोणते नाही, यासाठी अध्यक्षांच्या दालनात बैठक घ्या आणि ठरवा असे सांगून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा प्रस्ताव कापला कोणी याचे उत्तर शेवटपर्यंत विरोधकांना मिळाले नाही, त्यांनीही ते जाणून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. ( विशेष प्रतिनिधी)