शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘उच्च रक्तदाबा’चा ग्रामीण भागांना विळखा

By admin | Updated: May 17, 2016 03:01 IST

पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख.

नम्रता फडणीस,

पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख. मात्र या भागांमध्येही आता शहरीकरण झपाट्याने सुरू झाल्याने ही ओळख काहीशी पुसली गेली आहे. बदलती जीवनशैली, फास्टफूडचे सेवन या कारणांमुळे आता ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च रक्तदाबाचा विळखा पडू लागला असल्याची बाब एका पाहणीद्वारे समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक असून, बहुतांश व्यक्ती आपल्याला ‘रक्तदाबा’चा त्रास आहे, याबाबतच अनभिज्ञ आहेत! सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लरी स्कूल आॅफ हेल्थ सायन्सेस’ विभागामध्ये एमएस्सी करणाऱ्या सोफिया अहमद आणि डॉ. अमित मेश्राम या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळील पाथरगाव, नाणेगाव, नायगाव, चिखलसे आणि कुसगाव या पाच गावांमध्ये सायलंट किलर समजल्या जाणाऱ्या ‘रक्तदाब’ या विकाराबाबत पाहणी केली. त्यासंदर्भात ‘अ स्टडी टू डिटरमाईन आॅफ रेजड ब्लड प्रेशर अँड असोसिएटेड रिस्क फॅक्टर्स इन अ रूरल एरिया आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट’ या विषयावर नुकताच संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे. यासाठी केईम रिसर्च संशोधन विभागाचे डॉ. सुदिप्तो रॉय यांचे मार्गदर्शन लाभले. या पाहणीविषयी सांगताना सोफिया अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली, की कामशेतजवळ ३८ गावं आहेत, त्यातील पाच गावांची निवड आम्ही केली, त्यानुसार त्यातील २२६ व्यक्तींची (स्त्री व पुरुष) वैयक्तिक आरोग्य तपासणी करण्याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार डाएट, मास इंडेक्स, व्यसन, उंची, वजन, शारीरिक हालचाली यांबाबत एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार ६६ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसले, म्हणजे या भागात रक्तदाबाचे प्रमाण हे २९.२ टक्के इतके आहे. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ४९.२ टक्के तर महिलांचे प्रमाण हे २१.२ टक्के आहे.