शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्राने नाही दिले ठोस आश्वासन

By admin | Updated: March 17, 2017 20:24 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17 - शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत ही बैठक आटोपली. त्यामुळे तूर्तास तरी शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 
 
शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने योजना आणावी. शेती क्षेत्रात गुंतवणूक वेळेची गरज आहे. राज्य सरकारही आपला वाटा उचलायला तयार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-याच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याचे तसेच आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
सध्या सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांकडून गदारोळ सुरु आहे. विरोधकांना यामध्ये सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही साथ देत आहे. राज्यातील शेतक-यांचं एकूण कर्ज 30 हजार 500 कोटी आहे. इतक कर्ज माफ केल्यास विकासासाठी राज्य सरकारकडे पैसा उरणार नाही त्यामुळे केंद्राने मदत करावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.