शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्राने नाही दिले ठोस आश्वासन

By admin | Updated: March 17, 2017 20:24 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17 - शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्यावर कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत ही बैठक आटोपली. त्यामुळे तूर्तास तरी शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. 
 
शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने योजना आणावी. शेती क्षेत्रात गुंतवणूक वेळेची गरज आहे. राज्य सरकारही आपला वाटा उचलायला तयार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-याच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारचे जे प्रयत्न सुरु आहेत त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याचे तसेच आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
सध्या सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांकडून गदारोळ सुरु आहे. विरोधकांना यामध्ये सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही साथ देत आहे. राज्यातील शेतक-यांचं एकूण कर्ज 30 हजार 500 कोटी आहे. इतक कर्ज माफ केल्यास विकासासाठी राज्य सरकारकडे पैसा उरणार नाही त्यामुळे केंद्राने मदत करावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.