शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महिला पोलिसांची चिंता मिटली

By admin | Updated: July 4, 2014 01:11 IST

पोलीस विभागातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून कर्तव्यावर जावे लागत होते. पण आता पोलीस मुख्यालयातील पाळणाघराने त्यांची ती चिंता दूर केली असल्याचे प्रतिपादन

आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन : पाळणाघराचे उद्घाटन नागपूर : पोलीस विभागातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून कर्तव्यावर जावे लागत होते. पण आता पोलीस मुख्यालयातील पाळणाघराने त्यांची ती चिंता दूर केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले. पोलीस मुख्यालयातील पाळणाघराचे गुरुवारी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शहर पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्यासह सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अपर पोलीस आयुक्त दीपक पांड्ये, उपायुक्त सुनील कोल्हे व माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होेते. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील पोलीस खात्यात इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक महिलांची संख्या आहे. येथे अधिकाऱ्यांसह २१ हजार महिला पोलीस कर्मचारी आहेत; शिवाय शहर पोलिसांमध्ये ९८५ महिला आहेत. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी पोलीस खात्यात महिला कर्मचाऱ्यांची कल्पनासुद्धा केली जात नव्हती. पण अलीकडे मोठ्या प्रमाणात महिलांची भरती झाली आहे. मात्र या महिलांना अनेकदा आपले छोटे मूल घरी सोडून कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर पडावे लागते. अशाच काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन त्यांच्या काही समस्या मांडल्या होत्या. त्यापैकी पाळणाघर एक समस्या होती. यानंतर लगेच पाळणाघराची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नागपूर पोलिसांचे राज्यभरात अनुकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त के. के. पाठक म्हणाले, पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पाळणाघर सुरू करण्यात आले. सध्या येथे २५ ते ३० मुले ठेवण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे; परंतु लवकरच ती क्षमता १०० पर्यंत वाढविण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)