शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

By admin | Updated: February 6, 2017 02:27 IST

आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे

जळगाव : आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामधून केवळ त्याचा अभ्यास होवू शकतो. मात्र त्याला विज्ञान कळू शकत नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे, अशीही अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद मुंबई व जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक अ.पां.देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.व्ही.सोमवंशी, जिल्हा कार्यवाहक दीपक तांबोळी, कोषाध्यक्ष शशिकांत नेहते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरुणांपर्यंत विज्ञान पोहोचणे आवश्यक - कुलकर्णीसंमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती. तरुणांपर्यंत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.