शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

"समृद्धी"ची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा संकल्पना स्वीकारणार: मुख्यमंत्री

By admin | Updated: July 9, 2017 18:31 IST

एकीकडे राज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र समृध्दी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल

ऑनलाइन लोकमत 
 
नागपूर, दि. 9 - एकीकडे राज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी  मात्र समृध्दी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा नाविन्यपूर्ण संकल्पना स्वीकारणार असल्याचं म्हटलं आहे.  राज्याच्या विकासाला नवी दिशा देणा-या महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई या समृध्दी महामागार्मुळे केवळ वेळेची बचतच होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. समृध्दी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविण्यपूर्ण तसेच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पूल व बोगद्यांच्या निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट रचना आणि आकर्षकते संदर्भातील आंतरराष्ट्रीय अभियंता परिषदेचे आयोजन  केंद्रीय महामार्ग निर्मिती विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय पूल व अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष तथा एन एच ए आयचे सदस्य डी. ओ. तावडे, आय. के. पांडया, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ. वर्षा सुब्बाराव, आर. के.पांडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे  व्यासपिठावर उपस्थित होते.
 
समृद्धीला विरोध वाढला- 
 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध तीव्र होत आहे.  समृद्धी महामार्गाला जमिनी देणार नाही, बळजबरी केली तर सामुदायिक आत्महत्या करू असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. नाशिकमधील शिवडे गावासह 49 गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.  तर एका शेतक-यानं स्वतःचं सरण रचलं आहे. याशिवाय  झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचा इशाराही अनेक शेतक-यांनी दिला आहे.  समृद्धी महामार्गाला विरोध तीव्र बनला असून तणावपूर्ण परिस्थिती आहे.
 
सिन्नर तालुक्यासह नाशकात ‘समृद्धी’च्या दरपत्रकाची होळी- 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे दर जाहीर झाल्याचे तीव्र पडसाद जमीन मालकांमध्ये उमटले असून, शनिवारी शिवडे व नाशिक येथे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकाची होळी करून आपला निषेध नोंदविला तर दुसरीकडे प्रशासनानेही तातडीने तलाठ्यांची बैठक घेऊन जमिनीच्या थेट खरेदीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. शिवसेना, राष्ट्रवादी व किसान सभेने यासंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केल्याने नजिकच्या काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सिन्नर व इगतपुरी या तालुक्यातील जमीनमालकांसाठी जिल्हा समितीने दर निश्चिती केले असून, थेट खरेदीने जमीन देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना ४८ तासांत पैसे अदा करण्याची भूमिका घेतली आहे. जाहीर झालेले दर शेतकरी स्वीकारतील, अशी अपेक्षा असतानाच त्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले.
 
 
सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सकाळी दरपत्रकाची होळी केली. यावेळी शासनाला जमीनच द्यायची नाही तर दर कशाला, असा सवाल विचारण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक आयटक कार्यालयात अध्यक्ष कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत बागायती, जिरायती असा दर जाहीर करून शासन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ४० ते ६० लाख रुपये हेक्टरी दर ही एकत्र कुटुंब पद्धतीच्या गुजराणासाठी पुरेशी नाही. या महामार्गाच्या विरोधात उच्च न्यायालयात ३१ केसेस उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून, शासन यासंदर्भात न्यायालयाच्या नोटिसांना उत्तरे देत नाही तर दुसरीकडे दर जाहीर करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांनी बागायती जमिनी जिरायती दाखविल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. शासनाने समृद्धीचा मार्ग बदलावा, एकही शेतकरी जागा देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन दरपत्रकाची होळी केली. यावेळी शासन तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. परंतु शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता त्यांना ताब्यात न घेता नंतर गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. या आंदोलनात सोमनाथ वाघ, कचरू पाटील, भास्कर गुंजाळ, रतनकुमार इचम, दौलत दुभाषे, अरुण गायकर, पांडुरंग वारूंगसे, मुकुंदा कडू, विष्णुपंत वाघचौरे, विलास आव्हाड, रामेश्वर शिंदे, संदीप खताळे, गंगाधर गुंजाळ, रतन लंगडे, यशवंत गावढे, मधुकर फोकणे, तोकडे काळू, शशिकांत आव्हाड आदी शेतकरी उपस्थित होते.
अन्य ठिकाणीही होळी-
शासनाने समृध्दी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे जमिनीचे दरपत्रक जाहीर केल्याने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत जमिनीच्या दरपत्रकांची होळी केली. शनिवारी सकाळी डुबेरे, सोनारी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाचा निषेध केला. आम्हाला जमिनी द्यायच्या नाही असे सांगत शेतकऱ्यांनी जमिनीचे दरपत्रक जाळले.