शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुन्हा समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य!

By admin | Updated: May 28, 2017 00:13 IST

पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं.

- रविप्रकाश कुलकर्णीपुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं. अशावेळी समग्र सेतुमाधवराव पगडीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाचं आमंत्रण आलं तेव्हा मनात आलं, सगळंच काही अंधारलेलं नाही. उत्तम कलाकृतीला दाद मिळतेच. विशेष म्हणजे हे सर्व प्रकाशनाचं काम मराठी तेलंगण राज्य साहित्य परिषदेनी केलेलं आहे!समग्र सेतुमाधवराव पगडी प्रकल्पाची धुरा पाच वर्षांपूर्वी द. पं. जोशी आणि त्यांचे साहित्य परिषदेतील सहकारी यांनी पार पाडली. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत झाला होता. तर ज्ञानाचा हा भलामोठा व्याप तेव्हाच्या कार्यवाह असलेल्या डॉ. विद्या देवधर (आता द. पं. जोशींच्या निधनानंतर त्या अध्यक्ष आहेत.) यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आणखी एक बदल सांगायला हवा. द. पं. जोशी यांच्या कार्यकाळात मराठी साहित्य परिषद (आंध्र प्रदेश) ही विद्या देवधर यांच्या कार्यकाळात आता तेलंगण राज्यात आहे.महाराष्ट्राच्या बाहेरदेखील मराठीच्या उत्कर्षासाठी, संवर्धनासाठी अथक प्रयत्न चाललेले आहेत. याकडे ‘मराठी मराठी’ असं महाराष्ट्रात म्हणणाऱ्यांचे लक्ष जावे यासाठी मुद्दाम त्यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधतो...समग्र सेतुमाधवराव पगडी - दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन पुण्यात आहे. त्यासाठी अगत्याचे आमंत्रण या प्रकल्पाचे मुद्रक आनंद लाटकर यांनी दिले खरे. पण सध्याचा सुट्टीचा मोसम, गाड्यांची गर्दी आणि सर्वांत बिकट म्हणजे अति उन्हाळा त्यामुळे जावे की न जावे, असा प्रश्न मनात आला. पण त्याचवेळी सेतुमाधवराव पगडींची आठवण झाली. वयोपरत्वे तेदेखील थकत. लिहिण्या-वाचण्याचा कंटाळा कधी कधी येई. थांबवावं सगळं असं त्यांच्या मनात येई.पण हे सगळं क्षणभरच. कारण लगेच त्यांच्या मनात येई त्या तिकडे गिरगावात भटवाडीत आपलं वार्धक्य आणि क्षीण होत चाललेली प्रकृती याचा बाऊ न करता तो ज्ञानसूर्य गांधी चरित्र लिहिण्याची उमेद बाळगून साधनांची जुळवाजुळव करतो आहे आणि त्याच्यापुढे आपण आपल्या प्रकृतीची काय टिमकी वाजवायची? त्यांचा आळस आणि निराशा त्या क्षणाला जायची आणि ते परत कामाला लागत. हे ज्ञानसूर्य म्हणजे परखड आणि तर्कट असे प्रा. न. र. फाटक, ही आठवण खुद्द सेतुमाधवरावांनीच एकदा मला सांगितलेली. तेव्हा त्यांच्या समग्र वाङ्मय प्रकाशनाला आपण काहीतरी कारण पुढे करणं नव्हे मनात येणं याचीदेखील खरंच सांगतो - लाज वाटली!अर्थात, प्रकाशन समारंभाला गेलोच. पुण्याचं पत्रकार संघाचं सभागृह पूर्ण भरलेलं होतं. असा अनुभव हल्ली येत नाही, असं तेव्हा कुणीतरी म्हटलंदेखील.पण ही किमया होती सेतुमाधवराव पगडी यांच्या रसपूर्ण साहित्याची. लेखकाचं समग्र साहित्य प्रकाशित होणं ही मराठी साहित्य जगतात दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात पुन्हा त्याची दुसरी आवृत्ती निघणं ही तर जवळ जवळ अशक्यप्राय वाटावी अशी गोष्ट. समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्याचं म्हणूनदेखील वेगळेपण ठसावं.