शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

पुन्हा समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य!

By admin | Updated: May 28, 2017 00:13 IST

पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं.

- रविप्रकाश कुलकर्णीपुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं. अशावेळी समग्र सेतुमाधवराव पगडीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाचं आमंत्रण आलं तेव्हा मनात आलं, सगळंच काही अंधारलेलं नाही. उत्तम कलाकृतीला दाद मिळतेच. विशेष म्हणजे हे सर्व प्रकाशनाचं काम मराठी तेलंगण राज्य साहित्य परिषदेनी केलेलं आहे!समग्र सेतुमाधवराव पगडी प्रकल्पाची धुरा पाच वर्षांपूर्वी द. पं. जोशी आणि त्यांचे साहित्य परिषदेतील सहकारी यांनी पार पाडली. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत झाला होता. तर ज्ञानाचा हा भलामोठा व्याप तेव्हाच्या कार्यवाह असलेल्या डॉ. विद्या देवधर (आता द. पं. जोशींच्या निधनानंतर त्या अध्यक्ष आहेत.) यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आणखी एक बदल सांगायला हवा. द. पं. जोशी यांच्या कार्यकाळात मराठी साहित्य परिषद (आंध्र प्रदेश) ही विद्या देवधर यांच्या कार्यकाळात आता तेलंगण राज्यात आहे.महाराष्ट्राच्या बाहेरदेखील मराठीच्या उत्कर्षासाठी, संवर्धनासाठी अथक प्रयत्न चाललेले आहेत. याकडे ‘मराठी मराठी’ असं महाराष्ट्रात म्हणणाऱ्यांचे लक्ष जावे यासाठी मुद्दाम त्यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधतो...समग्र सेतुमाधवराव पगडी - दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन पुण्यात आहे. त्यासाठी अगत्याचे आमंत्रण या प्रकल्पाचे मुद्रक आनंद लाटकर यांनी दिले खरे. पण सध्याचा सुट्टीचा मोसम, गाड्यांची गर्दी आणि सर्वांत बिकट म्हणजे अति उन्हाळा त्यामुळे जावे की न जावे, असा प्रश्न मनात आला. पण त्याचवेळी सेतुमाधवराव पगडींची आठवण झाली. वयोपरत्वे तेदेखील थकत. लिहिण्या-वाचण्याचा कंटाळा कधी कधी येई. थांबवावं सगळं असं त्यांच्या मनात येई.पण हे सगळं क्षणभरच. कारण लगेच त्यांच्या मनात येई त्या तिकडे गिरगावात भटवाडीत आपलं वार्धक्य आणि क्षीण होत चाललेली प्रकृती याचा बाऊ न करता तो ज्ञानसूर्य गांधी चरित्र लिहिण्याची उमेद बाळगून साधनांची जुळवाजुळव करतो आहे आणि त्याच्यापुढे आपण आपल्या प्रकृतीची काय टिमकी वाजवायची? त्यांचा आळस आणि निराशा त्या क्षणाला जायची आणि ते परत कामाला लागत. हे ज्ञानसूर्य म्हणजे परखड आणि तर्कट असे प्रा. न. र. फाटक, ही आठवण खुद्द सेतुमाधवरावांनीच एकदा मला सांगितलेली. तेव्हा त्यांच्या समग्र वाङ्मय प्रकाशनाला आपण काहीतरी कारण पुढे करणं नव्हे मनात येणं याचीदेखील खरंच सांगतो - लाज वाटली!अर्थात, प्रकाशन समारंभाला गेलोच. पुण्याचं पत्रकार संघाचं सभागृह पूर्ण भरलेलं होतं. असा अनुभव हल्ली येत नाही, असं तेव्हा कुणीतरी म्हटलंदेखील.पण ही किमया होती सेतुमाधवराव पगडी यांच्या रसपूर्ण साहित्याची. लेखकाचं समग्र साहित्य प्रकाशित होणं ही मराठी साहित्य जगतात दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात पुन्हा त्याची दुसरी आवृत्ती निघणं ही तर जवळ जवळ अशक्यप्राय वाटावी अशी गोष्ट. समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्याचं म्हणूनदेखील वेगळेपण ठसावं.