शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

By admin | Updated: July 10, 2017 01:51 IST

मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. याच कारणाने येथील पंढरपूर-पुणे-भीमाशंकर ही एसटी बस बंद करावी लागली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या घाटातील धोकादायक वळणावर कठडे बांधण्यात आले असून, हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.पुणे, चाकणमार्गे येणाऱ्या प्रवाशांना भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरमार्गाने २५ ते ३० कि.मी. जास्तीचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास राजगुरुनगरवरुन वाडा-डेहणे या मधल्या मार्गाने केल्यास २५-३० कि.मी.चा प्रवास व वेळ वाचतो. शिवाय या मार्गावरील ४० कि.मी.चा चासकमान धरणाशेजारून जाणारा रस्ता पर्यटकांना आकर्षित करतो. पुढे भोरगड व अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर म्हणजे पर्वणीच. त्यामुळे पर्यटक या मार्गाचा अवलंब करत असतात. मात्र, मंदोशी घाटातील धोकादायक वळणावर कठडे नसल्यामुळे मधल्या काळात पंढरपूर-पुणे -भीमाशंकर ही एसटी बस बंद करण्यात आली. ही बस आर्थिक फायद्याची ही ठरली परंतु सुरक्षिततेचे कारण देत बंद करण्यात आली. या नंतर या घाटाच्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली होती. घाटातील अनेक धोकादायक वळणांवर कठडे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. पुणे विभागीय अधिकारी यांना २०१५मध्ये भीमाशंकर -राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, त्यानंतर वाहतूक नियंत्रक, पुणे यांनी फेब्रुवारी २०१५ ला या नवीन फेरीस रीतसर मंजुरी दिली. परंतु या रस्त्याचे सर्वेक्षण केल्यावर मंदोशी घाटातील दुसऱ्या वळणावर कठडा बांधणे आवश्यक असल्याचा अहवाल दिल्याने बस सुरू होऊ शकली नाही. परंतु आता या सर्व त्रुटी पूर्ण झाल्यामुळे व घाटरस्ता पूर्ण सुरक्षित असल्याने श्रावण महिना सुरू होण्याआधी ही एसटी बस सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडे प्रवाशांच्या वतीने मागणी केली आहे.’’- अ‍ॅड. सुरेश कौदरे, सहकार्यकारी विश्वस्त, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान.भीमाशंकरला जाणारा जवळचा मार्गभीमाशंकर येथे जाण्यासाठी राजगुरुनगरवरुन एकही एसटी बस नसल्यामुळे भीमाशंकरला चाकण, पुणे मार्गे येणाऱ्या भाविकांना मंचर मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नाहक वेळ व पैसा खर्च होत आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची भोरगिरी, कोटेश्वरच्या निसर्गरम्य परिसराला पसंती असल्याने त्यांना या मार्गाने जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी पाहता या मार्गे भीमाशंकर-राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.पावसाळ्यात येणारे पर्यटक व पुढे श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी भीमाशंकर- -राजगुरुनगर एसटी बस सुरू होणे आवश्यक आहे.अनेक वेळा तोंडी मागणी केली जाते परंतु एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे ‘लोकमत’च्या माध्यमातून अनेक भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी ही बस त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.