शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

By admin | Updated: July 10, 2017 01:51 IST

मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. याच कारणाने येथील पंढरपूर-पुणे-भीमाशंकर ही एसटी बस बंद करावी लागली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या घाटातील धोकादायक वळणावर कठडे बांधण्यात आले असून, हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.पुणे, चाकणमार्गे येणाऱ्या प्रवाशांना भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरमार्गाने २५ ते ३० कि.मी. जास्तीचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास राजगुरुनगरवरुन वाडा-डेहणे या मधल्या मार्गाने केल्यास २५-३० कि.मी.चा प्रवास व वेळ वाचतो. शिवाय या मार्गावरील ४० कि.मी.चा चासकमान धरणाशेजारून जाणारा रस्ता पर्यटकांना आकर्षित करतो. पुढे भोरगड व अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर म्हणजे पर्वणीच. त्यामुळे पर्यटक या मार्गाचा अवलंब करत असतात. मात्र, मंदोशी घाटातील धोकादायक वळणावर कठडे नसल्यामुळे मधल्या काळात पंढरपूर-पुणे -भीमाशंकर ही एसटी बस बंद करण्यात आली. ही बस आर्थिक फायद्याची ही ठरली परंतु सुरक्षिततेचे कारण देत बंद करण्यात आली. या नंतर या घाटाच्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली होती. घाटातील अनेक धोकादायक वळणांवर कठडे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. पुणे विभागीय अधिकारी यांना २०१५मध्ये भीमाशंकर -राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, त्यानंतर वाहतूक नियंत्रक, पुणे यांनी फेब्रुवारी २०१५ ला या नवीन फेरीस रीतसर मंजुरी दिली. परंतु या रस्त्याचे सर्वेक्षण केल्यावर मंदोशी घाटातील दुसऱ्या वळणावर कठडा बांधणे आवश्यक असल्याचा अहवाल दिल्याने बस सुरू होऊ शकली नाही. परंतु आता या सर्व त्रुटी पूर्ण झाल्यामुळे व घाटरस्ता पूर्ण सुरक्षित असल्याने श्रावण महिना सुरू होण्याआधी ही एसटी बस सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडे प्रवाशांच्या वतीने मागणी केली आहे.’’- अ‍ॅड. सुरेश कौदरे, सहकार्यकारी विश्वस्त, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान.भीमाशंकरला जाणारा जवळचा मार्गभीमाशंकर येथे जाण्यासाठी राजगुरुनगरवरुन एकही एसटी बस नसल्यामुळे भीमाशंकरला चाकण, पुणे मार्गे येणाऱ्या भाविकांना मंचर मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नाहक वेळ व पैसा खर्च होत आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची भोरगिरी, कोटेश्वरच्या निसर्गरम्य परिसराला पसंती असल्याने त्यांना या मार्गाने जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी पाहता या मार्गे भीमाशंकर-राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.पावसाळ्यात येणारे पर्यटक व पुढे श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी भीमाशंकर- -राजगुरुनगर एसटी बस सुरू होणे आवश्यक आहे.अनेक वेळा तोंडी मागणी केली जाते परंतु एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे ‘लोकमत’च्या माध्यमातून अनेक भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी ही बस त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.