शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

८३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करा

By admin | Updated: December 24, 2014 00:47 IST

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे.

धडक सिंचन कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना नागपूर : विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे. या कार्यक्रमामुळे विदर्भातील शाश्वत सिंचन वाढणार असून या कार्यक्रमांतर्गत ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती व नागपूर विभागाची रोजगार हमी योजनेंतर्गत जवाहर विहीर योजना व धडक सिंचन विहीर योजनेसंदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. अपर मुख्य सचिव (नियोजन) के.पी. बक्षी, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, नरेगाचे आयुक्त एम. शंकर नारायणन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर वारजुरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारे, उपसचिव आर. विमला प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा शाश्वत सिंचन वाढीचा महत्त्वाचा कार्यक्रम समजून राबवा. मध्यप्रदेशमध्ये मागील तीन वर्षात तीन लाख विहिरी केल्या आहेत. त्याच धर्तीवर विदर्भात ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण करून यापुढेही कसे अधिक काम करता येईल, हे पाहावे. जनतेकडून विहिरींसाठी अधिक मागणी असल्यास ती घ्यावी. मागणीनुसार या योजनेत काही बदल करून व्यवस्थितपणे आढावा घेऊन योजना सुधारित कार्यक्रम राबवावा. (प्रतिनिधी)१५ दिवसात बैठक घेण्यात यावीजास्तीतजास्त विहिरी पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करावेत. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेले ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण होण्यासाठी येत्या १५ दिवसात बैठक घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.