शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

८३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करा

By admin | Updated: December 24, 2014 00:47 IST

विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे.

धडक सिंचन कार्यक्रम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना नागपूर : विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे. या कार्यक्रमामुळे विदर्भातील शाश्वत सिंचन वाढणार असून या कार्यक्रमांतर्गत ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती व नागपूर विभागाची रोजगार हमी योजनेंतर्गत जवाहर विहीर योजना व धडक सिंचन विहीर योजनेसंदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. अपर मुख्य सचिव (नियोजन) के.पी. बक्षी, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, नरेगाचे आयुक्त एम. शंकर नारायणन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर वारजुरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारे, उपसचिव आर. विमला प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा शाश्वत सिंचन वाढीचा महत्त्वाचा कार्यक्रम समजून राबवा. मध्यप्रदेशमध्ये मागील तीन वर्षात तीन लाख विहिरी केल्या आहेत. त्याच धर्तीवर विदर्भात ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण करून यापुढेही कसे अधिक काम करता येईल, हे पाहावे. जनतेकडून विहिरींसाठी अधिक मागणी असल्यास ती घ्यावी. मागणीनुसार या योजनेत काही बदल करून व्यवस्थितपणे आढावा घेऊन योजना सुधारित कार्यक्रम राबवावा. (प्रतिनिधी)१५ दिवसात बैठक घेण्यात यावीजास्तीतजास्त विहिरी पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करावेत. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत निश्चित करण्यात आलेले ८३ हजार २०० विहिरींचा लक्ष्यांक पूर्ण होण्यासाठी येत्या १५ दिवसात बैठक घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.