शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सासवड माळी जमीन घोटाळ्याची चौकशी सहा महिन्यांत पूर्ण कर

By admin | Updated: February 14, 2015 03:48 IST

सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखान्याची ३,७५० एकर जमीन कमाल शेतजमीन धारणा कायद्यानुसार

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखान्याची ३,७५० एकर जमीन कमाल शेतजमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त ठरून हातची जाऊ नये, यासाठी सुमारे ५० वर्षांपूर्वी महसुली नोंदींमध्ये लबाडीने फेरफार करून झालेल्या घोटाळ्याची चौकशी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.खरेतर राज्य सरकारने पुण्याच्या विभागीय उपायुक्तांना या कामी विशेष चौकशीचे अधिकारी नेमून चौकशी करण्याचा निर्णय १९८९ मध्येच घेतला होता. परंतु या जमिनीच्या कथित भाडेपट्टेधारकांनी व कारखान्याच्या भागधारकांनी कोर्टकज्जे केल्याने हे काम गेली २५ वर्षे रेंगाळले होते.मुंबई उच्च न्यायालयानेही सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचा व विभागीय उपायुक्तांना या चौकशीखेरीज अन्य कोणतेही काम न देण्याचा आदेश डिसेंबर २००६ मध्येच दिला होता. परंतु त्याविरुद्ध मधुकर साधबा शिवरकर, सुवर्णा विजयराव रासकर व रंजनाबाई मधुकर सपकाळ यांच्यासह इतरांनी केलेली अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने अपिले फेटाळून उच्च न्यायालयाचा आदेश कायम केला. एवढेच नव्हे तर ठरलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या जमिनींबाबत सर्व संबंधितांनी जैसे थे स्थिती ठेवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयात चार फौजदारी खटले चालून त्यात आरोपींना झालेली कारावासाची शिक्षा नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम झाली होती. त्यात समोर आलेल्या माहितीच्या आधारेच ही प्रशासकीय चौकशी करण्यात येत आहे.