शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पाणीकपात रद्द करण्यावरून युतीत स्पर्धा

By admin | Updated: July 17, 2016 05:35 IST

तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये

 मुंबई : तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे़ पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाने मागणी केल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून पाणीकपात सर्वात आधी रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू झाली आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये प्रमुख तलावांत सुमारे सात लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा जमा झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा चार लाख दशलक्ष लीटर्सहून अधिक आहे़ त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे़ पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त विकास कामांचे श्रेय खिशात घालण्यासाठी युतीमध्ये चढाओढ सुरूआहे़ बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा सदस्याने पाणीकपात मागे घेण्याची मागणी परस्पर केली़ त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी तत्काळ आयुक्तांना पत्र लिहून पाणीकपात मागे घेण्याची मागणी शनिवारी केली़ (प्रतिनिधी)पुरेसा पाणीसाठा- मुंबईत दररोज ३,७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो़ आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू आहे़ गेल्या वर्षी आजच्या तारखेला तलावांमध्ये दोन लाख ७८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता़, या वर्षी आता सहा लाख ९८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़