शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

दुष्काळात रेशीमगाठींचे सामुदायिक ‘कर्तव्य’भान!

By admin | Updated: May 2, 2016 00:35 IST

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात

- प्रताप नलावडे,  बीडमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात गतिमान झाली आहे. एवढेच नव्हेतर ‘एक तिथी एक गाव’ या संकल्पनेवरही काही गावांमधून गांभीर्याने विचार सुरू आहे. दुष्काळाने कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेने सतावले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकाच मांडवाखाली अनेक जोडपी विवाहबद्ध झाली असून, संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात मिळाल्याने त्यांच्या खर्चाचीही बचत झाली. काही विवाह सोहळ्यांमध्ये ‘भू्रणहत्या करू नका’, ‘सुखी संसार करा’, ‘पत्नीला सुखाने नांदवा’ असे वडीलकीचे उपदेशही देण्यात आले. परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे ५४ जोडपी विवाहबद्ध झाली. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२ मुलींचा विवाह झाला. उद्योजक गौतम खटोड यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात हा सोहळा झाला. खटोड यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह या सोहळ्यात लावून त्याला चळवळीचे स्वरूप दिले. मुख्यमंत्र्यांची उपस्थिती!१७ एप्रिलला पालवण येथील चारा छावणीत ४१ मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास आवर्जून उपस्थित राहिले. ६ हजार जनावरांना आधार ठरलेल्या यशवंत सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी छावणीतच मांडव उभारून भावाची भूमिका निभावली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या सोहळ्यात यंदा दीड हजार वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. अंबाजोगाईत गवळी समाज आणि ककैय्या समाजाच्या वतीने सामुदायिक सोहळा झाला. पाटोद्यात समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे तर माजलगावात बाळू ताकट या सर्वसामान्य तरुणाने फेबु्रवारीमध्ये विवाह सोहळ्याचा खर्च उचलला.जिल्हा बँक संचालक चंद्रकांत शेजूळ, अंबाजोगाईत मुस्लीम गवळी समाज, शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये ३० एप्रिलला तर अंबाजोगाईत वसुंधरा सेवा प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारातून विवाह सोहळे होत आहेत.