शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

दुष्काळात रेशीमगाठींचे सामुदायिक ‘कर्तव्य’भान!

By admin | Updated: May 2, 2016 00:35 IST

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात

- प्रताप नलावडे,  बीडमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात गतिमान झाली आहे. एवढेच नव्हेतर ‘एक तिथी एक गाव’ या संकल्पनेवरही काही गावांमधून गांभीर्याने विचार सुरू आहे. दुष्काळाने कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेने सतावले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकाच मांडवाखाली अनेक जोडपी विवाहबद्ध झाली असून, संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात मिळाल्याने त्यांच्या खर्चाचीही बचत झाली. काही विवाह सोहळ्यांमध्ये ‘भू्रणहत्या करू नका’, ‘सुखी संसार करा’, ‘पत्नीला सुखाने नांदवा’ असे वडीलकीचे उपदेशही देण्यात आले. परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे ५४ जोडपी विवाहबद्ध झाली. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२ मुलींचा विवाह झाला. उद्योजक गौतम खटोड यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात हा सोहळा झाला. खटोड यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह या सोहळ्यात लावून त्याला चळवळीचे स्वरूप दिले. मुख्यमंत्र्यांची उपस्थिती!१७ एप्रिलला पालवण येथील चारा छावणीत ४१ मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास आवर्जून उपस्थित राहिले. ६ हजार जनावरांना आधार ठरलेल्या यशवंत सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी छावणीतच मांडव उभारून भावाची भूमिका निभावली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या सोहळ्यात यंदा दीड हजार वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. अंबाजोगाईत गवळी समाज आणि ककैय्या समाजाच्या वतीने सामुदायिक सोहळा झाला. पाटोद्यात समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे तर माजलगावात बाळू ताकट या सर्वसामान्य तरुणाने फेबु्रवारीमध्ये विवाह सोहळ्याचा खर्च उचलला.जिल्हा बँक संचालक चंद्रकांत शेजूळ, अंबाजोगाईत मुस्लीम गवळी समाज, शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये ३० एप्रिलला तर अंबाजोगाईत वसुंधरा सेवा प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारातून विवाह सोहळे होत आहेत.