शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीसाठी समिती

By admin | Updated: October 24, 2015 03:17 IST

राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई : राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. गट अ ते ड पर्यंतची विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव पूर्ण समर्थनासह सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापि, रिक्त पदे भरण्याबाबत विभागांकडून कार्यवाहीच होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या तुलनेने भरती मात्र होत नाही. दरवर्षी ३ टक्के कर्मचारी निवृत्त होतात. म्हणून किमान ३ टक्के नोकरभरती करावी, असा आधीपासूनचा नियम होता पण तेवढीही भरती न झाल्याने पदांचा अनुशेष वाढत गेला. आजमितीला १ लाख ३२ हजार मंजूर पदे रिक्त आहेत. नव्या सरकारने निर्बंध हटविताना विभागप्रमुखांनी नोकरभरतीची परवानगी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून घ्यावी, असे आदेश दिले होते. मात्र, अनेक विभागप्रमुखांनी पदे रिक्त असूनही परवानगीची मागितली नव्हती. म्हणून आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आढावा घेऊन भरतीची परवानगी देईल. समितीत सामान्य प्रशासन सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव वा सचिव सदस्य असतील. (विशेष प्रतिनिधी)