शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

नोकर भरतीसाठी समिती

By admin | Updated: October 24, 2015 03:17 IST

राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई : राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरून नोकरभरतीचा अनुशेष दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. गट अ ते ड पर्यंतची विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव पूर्ण समर्थनासह सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापि, रिक्त पदे भरण्याबाबत विभागांकडून कार्यवाहीच होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या तुलनेने भरती मात्र होत नाही. दरवर्षी ३ टक्के कर्मचारी निवृत्त होतात. म्हणून किमान ३ टक्के नोकरभरती करावी, असा आधीपासूनचा नियम होता पण तेवढीही भरती न झाल्याने पदांचा अनुशेष वाढत गेला. आजमितीला १ लाख ३२ हजार मंजूर पदे रिक्त आहेत. नव्या सरकारने निर्बंध हटविताना विभागप्रमुखांनी नोकरभरतीची परवानगी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून घ्यावी, असे आदेश दिले होते. मात्र, अनेक विभागप्रमुखांनी पदे रिक्त असूनही परवानगीची मागितली नव्हती. म्हणून आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आढावा घेऊन भरतीची परवानगी देईल. समितीत सामान्य प्रशासन सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव वा सचिव सदस्य असतील. (विशेष प्रतिनिधी)