शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 04:51 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. शहा यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे २ आॅगस्टच्या रात्री महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन एसटी बस गाड्या आणि काही खासगी बस वाहून गेल्याने ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप १६ जणांचा ठावठिकाणा लागलेला नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच ही दुर्घटना घडली होती. तेव्हा विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. विधिमंडळातील या आश्वासनानुसार एस.के. शहा यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून सहा महिन्यांत या समितीने आपला अहवाल सादर करावा, असा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच जारी केला आहे. कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट १९५२ च्या तरतुदीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे. सावित्री नदीवरील पूल वाहून जाण्यास कारणीभूत झालेली परिस्थिती व त्यावरील वाहने वाहून जाण्यास कारणीभूत परिस्थिती व घटनांचा क्रम लावणे, पूल वाहून जाण्यामागे नैसर्गिक कारणे होती की मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडली याची पडताळणी करणे, पूल वाहून जाण्यामागे तांत्रिक तपासणी अधिकारी जबाबदारी असल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य शासनाला कायमस्वरूपी करावयाच्या उपाययोजना सुचविणे तसेच त्याअनुषंगाने शिफारसी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)