शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पोलीस अधीक्षकांसह चौघांवर आयोगाचा ठपका

By admin | Updated: June 15, 2014 02:32 IST

सरकारने हा अहवाल स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणारा कृती अहवालही विधानसभेत सादर केला.

मुंबई : पुणे जिल्ह्णातील मावळ येथे आंदोलकांना पांगविण्यासाठी चौकशी करणाऱ्या आयोगाने तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक,पोलीस निरिक्षक अशोक पाटील,पोलीस निरिक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. सरकारने हा अहवाल स्वीकारताना संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणारा कृती अहवालही विधानसभेत सादर केला.पिंपरी-चिंचवड बंद पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी द्रुतगती मार्गावर आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना पांगविण्यासाठी मावळ येथे पोलिसांनी सुरूवातीला केलेला गोळीबार समर्थनीय होता. परंतु जमावाची पांगापांग झाल्यानंतरही ज्या पद्धतीने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला गेला तो असमर्थनीय आहे, असा स्पष्ट ठपका मावळ गोळीबाराची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश एम.जी.गायकवाड आयोगाने ठेवला होता. पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी मावळ येथील गावक-यांनी ९ आॅगस्ट २०११ रोजी निदर्शने केली होती.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद पाडण्याचाही प्रयत्न झाला होता. आंदोलकांवर याप्रसंगी पोलिसांनी गोळीबारही केला होता.या गोळीबारात १४ जण जखमी झाले होते तर तीन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. सरकारने या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांचा चौकशी आयोग नेमला होता. सरकारने आयोगाचा अहवाल आपल्या कृती अहवालासह शनिवारी विधानसभेत सादर केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला जो बळाचा वापर केला त्याचे आयोगाने समर्थन केले आहे. मात्र जमावाची पांगापांग झाल्यानंतरही तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी एस.एल.आर या रायफलीमधून केलेला गोळीबार असमर्थनीय आहे तसेच पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी व पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांनी केलेला गोळीबारही समर्थनीय नाही असा स्पष्ट निष्कर्ष चौकशी आयोगाने व्यक्त केला असून, त्याची दखल सरकारने घेतली आहे. या अधिकाऱ्यांवर कायदेशीर पद्धत अनुसरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे कृती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)