शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 19:31 IST

तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़

ऑनलाइन लोकमतशिरपूर, दि. २६ : तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़ विशेषत: थाळनेर ग्रामपंचायतीत गावठान जागेवर कोळसा पाडण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने अनामत रक्कम भरली आहे. मात्र, त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नाही़ प्रशासनाची डोळेझाक करून बिनधास्तपणे हा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून या परिसरात सऱ्हास सुरू आहे. दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल अहमदनगर येथील कोळसा व्यापारी रमेश पवारसह अन्य व्यक्ती तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गावातील गावठाण व पडीत जमिनीवरील काटेरी झुडपांची दिवसाढवळ्या कत्तल करतात. आहेत़ होळनांथे, मांजरोद, थाळनेर, टेकवाडे, भटाणे, तऱ्हाडकसबे आदी गावांमध्ये राजरोसपणे कोळसा पाडण्याचा उद्योग सुरू आहे़पोलीस प्रशासन बसले मूग गिळूनकोळसा व्यापारी रमेश पवार यांनी थाळनेर येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर कोळसा पाडण्यासाठी रितसर अनामत भरली आहे़ कोळसा पाडल्यावर तो इतरत्र हलविण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते़ ती परवानगी कोणीही घेतलेली नाही़ मात्र त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे वनविभागाने गाडी पकडून कारवाई केली़एवढा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असतांना देखील पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे़ यामागे देखील मोठे ‘अर्थकारण’ दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ वृत्त प्रसिद्ध करूनही गांभीर्य नाहीयापूर्वी ‘लोकमत’ने १५ मार्च रोजी थाळनेर परिसरातील लहान गावांमध्ये वृक्षतोड करून कोळसा तयार करण्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही पोलीस प्रशासन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. अल्प मोबदल्यात राबविले जातेस्थानिक लोकांना अल्प मोबदला दिला जातो. तसेच ज्या शेतजमिनीवर काटेरी झाडे असतील त्या भागातील जमीन सपाटीकरण करून द्यावी, असा उद्योग कोळसा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे़ विषशेत: झाडे तोडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मजूर आणले जातात तर कोळसा पाडण्यासाठी अहमदनगर येथील मजूर आणले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वनविभाग व पोलीस यंत्रणेचा वचक नाही वनविभागाचे अधिकारी महसूल गावांकडे फिरकत नसल्यामुळे हा गोरख धंदा बिनधास्तपणे सुरू आहे़ कोळसा खाणी लावण्याची परवानगी तहसीलदारांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र, तरीही गाव पातळीवरील स्थानिक पुढारी व अधिकाऱ्यांना खूष ठेवून कोळसा खाणी सुरू आहेत़ इंदौर मार्केटला विकला जातो कोळसाकमी मोबदल्यात ग्रामस्थांकडून हा कोळसा तयार करून घेतल्यानंतर कोळसा हा इंदौर मार्केटला मोठ्या भावाने विकला जातो. त्यामुळेच हा व्यवसाय तापी काठालगत मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे़