शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 19:31 IST

तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़

ऑनलाइन लोकमतशिरपूर, दि. २६ : तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़ विशेषत: थाळनेर ग्रामपंचायतीत गावठान जागेवर कोळसा पाडण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने अनामत रक्कम भरली आहे. मात्र, त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नाही़ प्रशासनाची डोळेझाक करून बिनधास्तपणे हा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून या परिसरात सऱ्हास सुरू आहे. दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल अहमदनगर येथील कोळसा व्यापारी रमेश पवारसह अन्य व्यक्ती तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गावातील गावठाण व पडीत जमिनीवरील काटेरी झुडपांची दिवसाढवळ्या कत्तल करतात. आहेत़ होळनांथे, मांजरोद, थाळनेर, टेकवाडे, भटाणे, तऱ्हाडकसबे आदी गावांमध्ये राजरोसपणे कोळसा पाडण्याचा उद्योग सुरू आहे़पोलीस प्रशासन बसले मूग गिळूनकोळसा व्यापारी रमेश पवार यांनी थाळनेर येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर कोळसा पाडण्यासाठी रितसर अनामत भरली आहे़ कोळसा पाडल्यावर तो इतरत्र हलविण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते़ ती परवानगी कोणीही घेतलेली नाही़ मात्र त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे वनविभागाने गाडी पकडून कारवाई केली़एवढा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असतांना देखील पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे़ यामागे देखील मोठे ‘अर्थकारण’ दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ वृत्त प्रसिद्ध करूनही गांभीर्य नाहीयापूर्वी ‘लोकमत’ने १५ मार्च रोजी थाळनेर परिसरातील लहान गावांमध्ये वृक्षतोड करून कोळसा तयार करण्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही पोलीस प्रशासन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. अल्प मोबदल्यात राबविले जातेस्थानिक लोकांना अल्प मोबदला दिला जातो. तसेच ज्या शेतजमिनीवर काटेरी झाडे असतील त्या भागातील जमीन सपाटीकरण करून द्यावी, असा उद्योग कोळसा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे़ विषशेत: झाडे तोडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मजूर आणले जातात तर कोळसा पाडण्यासाठी अहमदनगर येथील मजूर आणले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वनविभाग व पोलीस यंत्रणेचा वचक नाही वनविभागाचे अधिकारी महसूल गावांकडे फिरकत नसल्यामुळे हा गोरख धंदा बिनधास्तपणे सुरू आहे़ कोळसा खाणी लावण्याची परवानगी तहसीलदारांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र, तरीही गाव पातळीवरील स्थानिक पुढारी व अधिकाऱ्यांना खूष ठेवून कोळसा खाणी सुरू आहेत़ इंदौर मार्केटला विकला जातो कोळसाकमी मोबदल्यात ग्रामस्थांकडून हा कोळसा तयार करून घेतल्यानंतर कोळसा हा इंदौर मार्केटला मोठ्या भावाने विकला जातो. त्यामुळेच हा व्यवसाय तापी काठालगत मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे़