शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 19:31 IST

तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़

ऑनलाइन लोकमतशिरपूर, दि. २६ : तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़ विशेषत: थाळनेर ग्रामपंचायतीत गावठान जागेवर कोळसा पाडण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने अनामत रक्कम भरली आहे. मात्र, त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नाही़ प्रशासनाची डोळेझाक करून बिनधास्तपणे हा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून या परिसरात सऱ्हास सुरू आहे. दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल अहमदनगर येथील कोळसा व्यापारी रमेश पवारसह अन्य व्यक्ती तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गावातील गावठाण व पडीत जमिनीवरील काटेरी झुडपांची दिवसाढवळ्या कत्तल करतात. आहेत़ होळनांथे, मांजरोद, थाळनेर, टेकवाडे, भटाणे, तऱ्हाडकसबे आदी गावांमध्ये राजरोसपणे कोळसा पाडण्याचा उद्योग सुरू आहे़पोलीस प्रशासन बसले मूग गिळूनकोळसा व्यापारी रमेश पवार यांनी थाळनेर येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर कोळसा पाडण्यासाठी रितसर अनामत भरली आहे़ कोळसा पाडल्यावर तो इतरत्र हलविण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते़ ती परवानगी कोणीही घेतलेली नाही़ मात्र त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे वनविभागाने गाडी पकडून कारवाई केली़एवढा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असतांना देखील पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे़ यामागे देखील मोठे ‘अर्थकारण’ दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ वृत्त प्रसिद्ध करूनही गांभीर्य नाहीयापूर्वी ‘लोकमत’ने १५ मार्च रोजी थाळनेर परिसरातील लहान गावांमध्ये वृक्षतोड करून कोळसा तयार करण्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही पोलीस प्रशासन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. अल्प मोबदल्यात राबविले जातेस्थानिक लोकांना अल्प मोबदला दिला जातो. तसेच ज्या शेतजमिनीवर काटेरी झाडे असतील त्या भागातील जमीन सपाटीकरण करून द्यावी, असा उद्योग कोळसा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे़ विषशेत: झाडे तोडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मजूर आणले जातात तर कोळसा पाडण्यासाठी अहमदनगर येथील मजूर आणले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वनविभाग व पोलीस यंत्रणेचा वचक नाही वनविभागाचे अधिकारी महसूल गावांकडे फिरकत नसल्यामुळे हा गोरख धंदा बिनधास्तपणे सुरू आहे़ कोळसा खाणी लावण्याची परवानगी तहसीलदारांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र, तरीही गाव पातळीवरील स्थानिक पुढारी व अधिकाऱ्यांना खूष ठेवून कोळसा खाणी सुरू आहेत़ इंदौर मार्केटला विकला जातो कोळसाकमी मोबदल्यात ग्रामस्थांकडून हा कोळसा तयार करून घेतल्यानंतर कोळसा हा इंदौर मार्केटला मोठ्या भावाने विकला जातो. त्यामुळेच हा व्यवसाय तापी काठालगत मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे़