शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच!

By admin | Updated: May 12, 2016 04:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पाणीटंचाई निवारणासाठी अनेक घोषणा केल्या.

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पाणीटंचाई निवारणासाठी अनेक घोषणा केल्या. टँकरने पाणीपुरवठा अन् चर खोदण्याची घोषणा वगळता अन्य अर्ध्या घोषणा कागदावरच आहेत. मुख्यमंत्र्यांनी भंडारवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ३७ कोटींचा निधी जाहीर केला होती. शिवाय, मातोळा पाणीपुरवठा योजनेतून लातूरला पाणी आणण्यासाठी २४.४६ कोटी आणि डोंगरगाव प्रकल्पातून पानचिंचोली पाईपलाईनसाठी ४.७६ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १५ कोटी, उदगीर पाणीपुरवठ्यासाठी १२ कोटी, मांजरा, साई, नागझरी चर खोदण्यासाठी २ कोटी अशा योजनाही जाहीर केल्या होत्या. त्यापैकी टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजना तात्काळ अंमलात आली. या योजनेत आतापर्यंत ३ कोटी रुपये मनपाला मिळाले आहेत. तसेच चर खोदण्यासाठी ४ कोटी ७८ लाख रुपये स्थानिक प्रशासनाला मिळाले आहेत. अन्य योजनांच्या ना निविदा आहेत ना पैसे मिळाले. जवळपास अर्ध्या योजना कागदावरच आहेत.भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा निधी पूर्वी परत गेला होता. मुख्यमंत्र्यांनी या योजनेलाच पुन्हा मंजुरी देऊन ३७ कोटींचा निधी जाहीर केला आहे.