शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’

By admin | Updated: September 5, 2016 02:44 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने शाळेत आणि त्यांचे घर, सोसायटीपासून स्वच्छतेला सुरुवात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रमुख शिक्षकांच्या सहभागाने नुकतीच विष्णुदास भावे नाट्यगृहात या उपक्रमाच्या माहितीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेतंर्गत आयुक्तांनी ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना स्पष्ट केली. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे १०० टक्के वर्गीकरण होईल या कल्पनेतून ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून नवी मुंबईची भावी पिढी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करेल, आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहर आणखी स्वच्छ व सुशोभित होईल, असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ नुसार तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्मितीच्या पातळीवरच कचरा वर्गीकरण करणे हे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने २ आॅक्टोबरपर्यंत शहरात १०० टक्के ओला - सुका कचरा वर्गीकरण झाले पाहिजे, हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत संकल्पनेविषयीची माहितीपुस्तिका व सीडी वितरीत करण्यात आली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग‘स्वच्छता सैनिक’ या संकल्पनेंतर्गत प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक हे मुख्य प्रशिक्षक व शिक्षक हे वर्गप्रमुख असणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षक वर्गातून एका मुलाची व मुलीची स्वच्छता सैनिक कर्णधार म्हणून निवड करतील. हे कर्णधार वर्गातील स्वच्छताविषयक उपक्र मांचा आढावा घेतील. याशिवाय वरच्या वर्गातून आणखी एक स्वच्छता सैनिक निवडला जाईल, जो शालेय स्तरावरील स्वच्छता कार्यक्र मांचे नियोजन व अवलोकन करेल. अशाप्रकारे वरच्या वर्गातून १० ते १५ विद्यार्थ्यांचा समूह निवडून शालेय स्तरावर स्वच्छताविषयक विविध कार्यक्र म राबविण्यात येतील.>सोसायटीत साधारणत: १०-१२ मुलांचा एक गट निर्माण केला जाणार आहे. या गटाव्दारे त्यांच्या कुटुंबात तसेच त्यांच्या सोसायटीत कचरा वर्गीकरण योग्य रीतीने होते आहे की नाही तसेच तो वेगवेगळ्या डब्यात ठेवला जातो आहे की नाही, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीत देतानाही वेगवेगळा दिला जातो आहे की नाही याचे निरीक्षण केले जाईल.कचरा वर्गीकरण न करणाऱ्या कुटुंबाला त्याचे महत्त्व ही मुले पटवून देतील तसेच घरकाम करणाऱ्या व्यक्तींना आणि वॉचमन यांनाही याबाबतचे महत्त्व समजून सांगतील.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते.