शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’

By admin | Updated: September 5, 2016 02:44 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने शाळेत आणि त्यांचे घर, सोसायटीपासून स्वच्छतेला सुरुवात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रमुख शिक्षकांच्या सहभागाने नुकतीच विष्णुदास भावे नाट्यगृहात या उपक्रमाच्या माहितीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेतंर्गत आयुक्तांनी ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना स्पष्ट केली. कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे १०० टक्के वर्गीकरण होईल या कल्पनेतून ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून नवी मुंबईची भावी पिढी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करेल, आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहर आणखी स्वच्छ व सुशोभित होईल, असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ नुसार तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्मितीच्या पातळीवरच कचरा वर्गीकरण करणे हे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने २ आॅक्टोबरपर्यंत शहरात १०० टक्के ओला - सुका कचरा वर्गीकरण झाले पाहिजे, हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत संकल्पनेविषयीची माहितीपुस्तिका व सीडी वितरीत करण्यात आली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग‘स्वच्छता सैनिक’ या संकल्पनेंतर्गत प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक हे मुख्य प्रशिक्षक व शिक्षक हे वर्गप्रमुख असणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षक वर्गातून एका मुलाची व मुलीची स्वच्छता सैनिक कर्णधार म्हणून निवड करतील. हे कर्णधार वर्गातील स्वच्छताविषयक उपक्र मांचा आढावा घेतील. याशिवाय वरच्या वर्गातून आणखी एक स्वच्छता सैनिक निवडला जाईल, जो शालेय स्तरावरील स्वच्छता कार्यक्र मांचे नियोजन व अवलोकन करेल. अशाप्रकारे वरच्या वर्गातून १० ते १५ विद्यार्थ्यांचा समूह निवडून शालेय स्तरावर स्वच्छताविषयक विविध कार्यक्र म राबविण्यात येतील.>सोसायटीत साधारणत: १०-१२ मुलांचा एक गट निर्माण केला जाणार आहे. या गटाव्दारे त्यांच्या कुटुंबात तसेच त्यांच्या सोसायटीत कचरा वर्गीकरण योग्य रीतीने होते आहे की नाही तसेच तो वेगवेगळ्या डब्यात ठेवला जातो आहे की नाही, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीत देतानाही वेगवेगळा दिला जातो आहे की नाही याचे निरीक्षण केले जाईल.कचरा वर्गीकरण न करणाऱ्या कुटुंबाला त्याचे महत्त्व ही मुले पटवून देतील तसेच घरकाम करणाऱ्या व्यक्तींना आणि वॉचमन यांनाही याबाबतचे महत्त्व समजून सांगतील.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते.