शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पालखी मार्गावर वारी स्वच्छतेची...!

By admin | Updated: June 29, 2017 17:16 IST

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तरडगावकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून मुक्कामादरम्यान सहभागी भाविकांची सेवा केली.

आॅनलाइन लोकमततरडगाव (सातारा), दि. 29 - श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तरडगावकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून मुक्कामादरम्यान सहभागी भाविकांची सेवा केली. पाऊस नसला तरी सोहळ्यानंतर रोगराई पसरू नये, याची दक्षता घेत पालखी मार्गावर वारी स्वच्छतेची राबविली जात आहे. त्याद्वारे पालखी तळाची स्वच्छता, मैलाची विल्हेवाट आणि जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.दरवर्षी सोहळ्यानंतर मुक्काम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते. यंदा ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वाढीव स्वच्छतागृहे दिल्याने तसेच निर्मल वारीअंतर्गत भाविकांना उघड्यावर बसण्यासाठी अटकाव बसावा या उद्देशाने पहाटेच्या सुमारास काही पथके तैनात करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम झाला असून, परिसर बऱ्यापैकी स्वच्छ राहण्याचे पाहायला मिळत आहे.माऊलींची वारी सध्या सोलापूर जिल्ह्यात असली तरी ज्या मार्गावरून पुढे गेली आहे, त्या भागात रोगराई पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव पालखी तळाची स्वच्छता पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थ्यानी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करून स्वछतेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी तळावरील बारीक-सारीक टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत पदाधिकारी, कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले. रोगराई बळाऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी जंतूनाशक पावडर टाकून औषध फवारणी देखील केली आहे. तरडगावसाठी सातशे स्वच्छतागृहे देण्यात आली होती. पालखी गेल्यानंतर मोठा खड्डा खोदून त्यात घाणीची विल्हेवाट लावण्यात आली. निर्मल वारीअंतर्गत दिलेल्या जादा स्वच्छतागृहामुळे तसेच राबविलेल्या उपाय योजनांमुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारीनंतर होणाऱ्या अस्वच्छतेस चांगला आळा बसला. तरीही रोगराई पसरू नये यासाठी ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणी करून दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती उपसरपंच अमोल गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.