शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

स्वच्छता अभियानावरच प्रश्नचिन्ह!

By admin | Updated: January 23, 2017 03:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. या अभियानाची

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. या अभियानाची ‘पोल’खोलण्याचे काम शनिवारी औरंगाबाद महापालिकेने केले. स्वच्छतेच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिकेकडून चक्क १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राज्यातील पाचपेक्षा अधिक शहरांमध्ये या पथकाने पाहणी केली. त्यामुळे या अभियानाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शैलेश बंजानिया यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे पथक २० जानेवारी रोजी शहरात दाखल झाले. पहिल्या दिवशी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना अस्वच्छतेवर झापझाप झापले. दुसऱ्या दिवशी तर पथकाने कहरच केला. काही व्यापाऱ्यांना चक्क दंडही आकारला. दिवसभर पाहणी दौरा संपल्यावर मनपा अधिकाऱ्यांकडे प्रथम महागड्या दारूची ‘फर्माईश’ करण्यात आली. २० हजार रुपयांची दारूहवी, असा हट्ट पथकातील सदस्यांनी धरला. महागडे सिगारेट पाकीटही मनपा अधिकाऱ्यांना मागवायला लावले. त्यांचा हा अवतार पाहून मनपा अधिकारी थक्क झाले होते. शनिवारी शैलेश बंजानिया याने शहराला ‘टॉप २०’मध्ये आणण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडे चक्क अडीच लाख रुपयांची मागणी केली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी, घनकचरा सहायक प्रमोद खोब्रागडे यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांमार्फत १ लाख ७० हजारांची लाच दिली. लाच स्वीकारताना शैलेश बंजानिया याला रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)