शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

स्वच्छतेची मोहीम घरापासून करा

By admin | Updated: February 5, 2017 23:48 IST

भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़

सोलापूर : भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़ त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करा, मग सार्वजनिक जीवनात स्वच्छ राहण्याची भाषा शोभून दिसेल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना खा़ चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर चौफेर टीका केली़ मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकासावर होणारे परिणाम, नोटाबंदीने जनतेची झालेली हालअपेष्ठा, अर्थव्यवस्थेवरील परिणाम आदी विषयांवर प्रकाश टाकला़ भाजपा-सेनेच्या भांडणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यात एकत्र काम करतात, यापूर्वी कोणत्याच सेनेच्या मंत्र्यांनी विरोध दर्शविला नाही़ आता नेमके निवडणुकीत भाजपाकडून औकात दाखवण्याची भाषा केली जाते आणि सेना निमूटपणे ऐकून घेते, हा सारा प्रकार जनतेची फसवणूक करण्यासाठी आहे़ सरकारच्या अपयशाचे खापर निवडणुकीत आपल्यावर फुटू नये यासाठी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध खेळी आहे़ यामुळे काँग्रेसला राजकारणात ‘स्पेस’ मिळू नये, झाला फायदा तर भाजपाचा अथवा सेनेचा व्हावा ही त्यामागची रणनीती आहे़ निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रच येणार आहेत़ खा़ किरीट सोमय्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़