शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सिंधुदुर्गचा पॅटर्न राज्यभर राबविणार

By admin | Updated: September 10, 2016 00:10 IST

विनोद तावडे यांची माहिती : सर्व प्राथमिक शाळा ई प्रणालीने जोडणार

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांनाही स्वच्छता अभियानात प्रेरणादायी ठरणारा स्वच्छतेचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार आणि महाराष्ट्र स्वच्छतेत अव्वल बनविणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.देवगड दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोगटे कुटुुंबीयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे, अभिषेक गोगटे, आदी उपस्थित होते.पत्रकाराशी संवाद साधताना तावडे यांनी इ-लर्निंग ही संकल्पना राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार असून, प्रत्येक शाळा संगणक प्रणालीने जोडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये ही संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पदे भरताना कोकणला प्राधान्य२००९ नंतर नवीन शाळांना अनुदान देण्यात येणार नाही. त्यांना विनाअनुदानीत तत्त्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. गटशिक्षणाधिकारी पदे भरताना कोकणाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ७८ पदे दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.दोन वर्षांनी महामार्ग सुस्थितीत असेलमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. भूसंपादनाचे ८० टक्के काम झाले असून, आॅक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. यावर्षी खड्डेमय झालेल्या महामार्गावर उपाययोजना केल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. दोन वर्षांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत असेल, असे तावडे यांनी सांगीतले.२0 पटसंख्येचा निर्णय डोंगराळ भागासाठी नाही२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना यापुढे गावातील मुख्य शाळांशी जोडण्यात येणार आहे. मात्र, डोंगराळ भागातील व मुलींच्या शाळांना यामधून वगळण्यात आले आहे. सामूहिक शिक्षण या संकल्पनेतून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना मुख्य शाळांमध्ये आणण्यात येणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.