शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

स्वच्छ सिंधुदुर्गचा पॅटर्न राज्यभर राबविणार

By admin | Updated: September 10, 2016 00:10 IST

विनोद तावडे यांची माहिती : सर्व प्राथमिक शाळा ई प्रणालीने जोडणार

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांनाही स्वच्छता अभियानात प्रेरणादायी ठरणारा स्वच्छतेचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार आणि महाराष्ट्र स्वच्छतेत अव्वल बनविणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.देवगड दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोगटे कुटुुंबीयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश गोगटे, अभिषेक गोगटे, आदी उपस्थित होते.पत्रकाराशी संवाद साधताना तावडे यांनी इ-लर्निंग ही संकल्पना राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार असून, प्रत्येक शाळा संगणक प्रणालीने जोडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये ही संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पदे भरताना कोकणला प्राधान्य२००९ नंतर नवीन शाळांना अनुदान देण्यात येणार नाही. त्यांना विनाअनुदानीत तत्त्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. गटशिक्षणाधिकारी पदे भरताना कोकणाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ७८ पदे दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.दोन वर्षांनी महामार्ग सुस्थितीत असेलमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. भूसंपादनाचे ८० टक्के काम झाले असून, आॅक्टोबर महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. यावर्षी खड्डेमय झालेल्या महामार्गावर उपाययोजना केल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. दोन वर्षांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत असेल, असे तावडे यांनी सांगीतले.२0 पटसंख्येचा निर्णय डोंगराळ भागासाठी नाही२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना यापुढे गावातील मुख्य शाळांशी जोडण्यात येणार आहे. मात्र, डोंगराळ भागातील व मुलींच्या शाळांना यामधून वगळण्यात आले आहे. सामूहिक शिक्षण या संकल्पनेतून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना मुख्य शाळांमध्ये आणण्यात येणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.