शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पाकव्याप्त काश्मीरवर दाव्याची पहिली मागणी माझी!

By admin | Updated: August 14, 2016 01:18 IST

पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही.

नागपूर : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही. सगळेच राजकीय पक्ष काश्मीरबाबतीत केवळ व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत, असा थेट आरोप अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या भेटीत केला.काश्मिरी लोकांच्या सुरक्षेसाठीच तेथे सेनेचे जवान तैनात आहेत. हे विसरून जेव्हा त्या सैनिकांवर दगडफेक होते तेव्हा त्यांनी सुरक्षेसाठी पॅलेट गन चालवली तर यात गैर काय? पण, आपले राजकारणी याचेही राजकारण करीत आहेत. सैनिकांची बाजू न घेता दगडफेक करणाऱ्यांप्रती कळवळा दाखवला जात आहे. राजकारण्यांच्या अशा वागणुकीमुळे सैनिकांचे मनोबल खचत आहे. हे फार धोकादायक आहे, याकडे बिट्टा यांनी लक्ष वेधेले. कलम ३७० हटवाकलम ३७० ने काश्मीरचे खूप नुकसान केले आहे. स्वायत्ततेचा तेथे गैरफायदा घेतला जात आहे. सरकार कोणतेही असो काश्मीरसाठी विशेष पॅकेज देत असते. अशा पॅकेजमुळे त्या राज्यात ऐतखाऊ वृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक गैरफायदा येथील फुटीरवादी संघटना उचलत आहेत. एकीकडे सरकारच्या पॅकेजचा फायदा मिळवायचा आणि दुसरीकडे आयएसआयकडूनही निधी लाटायचा, असा गैरप्रकार काश्मिरात सुरू आहे. त्यामुळे ३७० कलम काढून टाकावे.माझ्यावर चित्रपट का नाही?‘उडता पंजाब’ चित्रपट नुकताच येऊन गेला. यात तर पंजाबचे असे चित्रण होते जणू येथील प्रत्येक घरात गर्दुले राहतात. व्यवसायाच्या दृष्टीने नकारात्मक विषय कॅश करता येतात हे फिल्म निर्मात्यांना चांगले माहीत आहे. म्हणूनच असे अवास्तविक चित्रपट काढले जातात. मी देशाच्या हिताचे बोलतो म्हणून माझ्यावर आतापर्यंत १६ हल्ले झाले. हे कुणा चित्रपट निर्मात्याला का दिसले नाही. बिट्टावर चित्रपट काढावा, असे कुणा निर्मात्याला का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.