शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाकव्याप्त काश्मीरवर दाव्याची पहिली मागणी माझी!

By admin | Updated: August 14, 2016 01:18 IST

पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही.

नागपूर : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही. सगळेच राजकीय पक्ष काश्मीरबाबतीत केवळ व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत, असा थेट आरोप अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या भेटीत केला.काश्मिरी लोकांच्या सुरक्षेसाठीच तेथे सेनेचे जवान तैनात आहेत. हे विसरून जेव्हा त्या सैनिकांवर दगडफेक होते तेव्हा त्यांनी सुरक्षेसाठी पॅलेट गन चालवली तर यात गैर काय? पण, आपले राजकारणी याचेही राजकारण करीत आहेत. सैनिकांची बाजू न घेता दगडफेक करणाऱ्यांप्रती कळवळा दाखवला जात आहे. राजकारण्यांच्या अशा वागणुकीमुळे सैनिकांचे मनोबल खचत आहे. हे फार धोकादायक आहे, याकडे बिट्टा यांनी लक्ष वेधेले. कलम ३७० हटवाकलम ३७० ने काश्मीरचे खूप नुकसान केले आहे. स्वायत्ततेचा तेथे गैरफायदा घेतला जात आहे. सरकार कोणतेही असो काश्मीरसाठी विशेष पॅकेज देत असते. अशा पॅकेजमुळे त्या राज्यात ऐतखाऊ वृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक गैरफायदा येथील फुटीरवादी संघटना उचलत आहेत. एकीकडे सरकारच्या पॅकेजचा फायदा मिळवायचा आणि दुसरीकडे आयएसआयकडूनही निधी लाटायचा, असा गैरप्रकार काश्मिरात सुरू आहे. त्यामुळे ३७० कलम काढून टाकावे.माझ्यावर चित्रपट का नाही?‘उडता पंजाब’ चित्रपट नुकताच येऊन गेला. यात तर पंजाबचे असे चित्रण होते जणू येथील प्रत्येक घरात गर्दुले राहतात. व्यवसायाच्या दृष्टीने नकारात्मक विषय कॅश करता येतात हे फिल्म निर्मात्यांना चांगले माहीत आहे. म्हणूनच असे अवास्तविक चित्रपट काढले जातात. मी देशाच्या हिताचे बोलतो म्हणून माझ्यावर आतापर्यंत १६ हल्ले झाले. हे कुणा चित्रपट निर्मात्याला का दिसले नाही. बिट्टावर चित्रपट काढावा, असे कुणा निर्मात्याला का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.