शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

शहरात घोडागाडीवर बंदी कायम

By admin | Updated: April 4, 2017 06:04 IST

शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी

मुंबई : शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी, यासाठी काही घोडागाडी मालक व चालकांनी केलेली फेरविचार याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने निकाली काढली. घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकारने धोरण आखले असून, हे धोरण कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जून २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने मुंबईत घोडागाडी चालवणे बेकायदा असल्याचे म्हणत, सर्व घोडागाडी व विनापरवाना तबेले बंद करण्याचा आदेश पालिकेला दिला, तसेच सरकारला घोडागाडी चालकांचे व मालकांचे पुनर्वसन करण्यासाठी सहा महिन्यांत धोरण आखण्याचा आदेश दिला. दीड वर्ष उलटूनही राज्य सरकारने घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत अंतिम धोरण तयार केलेले नाही. या निर्णयाविरुद्ध घोडागाडी मालक-चालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अन्य कायदेशीर पर्याय निवडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सुमारे ५० घोडागाडी मालक-चालकांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.घोडागाडी मालक-चालकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात धोरण तयार असून, ते मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे मांडण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यावर धोरण आखण्यास विलंब झाल्याची आठवण खंडपीठाने राज्य सरकारला करून देत, घोडागाडी चालकांची याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी) >न्यायालयाने नाकारली चालकांची विनंतीघोडागाडी मालक-चालकांनी आगामी दोन महिने सुट्टीचे असल्याने, या काळात घोडागाडी चालवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. मात्र, खंडपीठाने ती ही विनंती मान्य करण्यास नकार दिला असून शहरातील घोडागाडी बंदी कायम राहणार आहे.