शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

शहर स्वच्छता अभियानाचा ‘बुमरँग’

By admin | Updated: September 5, 2014 00:39 IST

महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे.

पुणो : शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लागावी तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ राहावे, या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण  स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे. या अभियानात क्रमांक मिळाल्यास प्रभागासाठी कोटय़ावधीचा निधी मिळत असल्याने या स्पर्धेसाठी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कोणतीही पर्यायी सुविधा न देता, शेकडो कचरा कंटेनर काढण्यात आले आहेत. परिणामी नागरिक जागा मिळेल तिथे रात्रीच्या अंधारात जागा मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. अभियानापूर्वी शहरात सुमारे 1017 कंटनेर होते. तर या अभियानात दोन वर्षात त्यांची संख्या 847 आणण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या संत गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पुणो शहरातही प्रभागांमध्ये नागरिकांच्या सहभागाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांच्या पुढाकाराने हे अभियान सुरू करण्यात आले. त्याता प्रमुख उद्देश शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लावणो तसेच शहरातील कचरा कंटेनरची संख्या कमी करून जास्तीत जास्त नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडी मध्ये देणो परिणामी कचरा वर्गीकरणही वाढेल आणि त्यावर प्रक्रिया करणोही सोपे जाईल असा होता. या अभियानासाठी दोन कोटींपासून 75 लाखांर्पयत बक्षिसही ठेवण्यात आले. मात्र, आता या अभियानाचा उलटाच परिणाम होत असल्याचे महापालिकेच्या नुकत्याच शहरात घाणींच्या ठिकाणांचे केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशी घाण असलेली तब्बल 800 ठिकाणो शहरात आढळून आली असली तरी, त्यातील सुमारे 20 टक्के ठिकाणी या अभियानासाठी कचरा कंटेनर काढून घेतलेल्या ठिकाणची आहेत. 
कंटेनर काढला मात्र, कचरा टाकण्याची सुविधाच दिली नाही लोकसहभागासाठी असलेला लोकांचा सहभागच या अभियानातून गायब होऊन केवळ कंटेनर कमी करणो हा एकमेव उददीष्ट या अभियानाचे बनले आहे. त्या अंतर्गत या अभियानाची जबाबदारी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांकडून कचरा कंटेनर कमी करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. हे कं़टेनर काढून घेण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांना काहीच माहिती दिली जात नाही. तसेच कंटेनर काढून घेताना, त्या भागात महापालिकेचे कचरा वेचक, तसेच कचरा संकलीत करण्यासाठी येणारी घंटागाडी कधी येईल. याची कोणतीही कल्पना दिली जात नाही. त्यामुळे नागरिक काही दिवस घरातच कचरा साठवतात, आणि पर्याय नसल्याने वाढलेला कचरा रात्रीच्या अंधारात पुन्हा कंटेनर काढून घेतलेल्या जागी अथवा रिकामी जागा मिळेल तिथे टाकतात.  
 
4महापालिकेकडून कचरा कंटेनर कमी केल्यानंतर त्यांच्या परिसरात येणा:या घंटागाडय़ाचे वेळापत्रक क्षेत्रीय कार्यालयाकडून देणो आवश्यक आहे. तसेच, त्या गाडय़ा नियमित येतील, याची खबरदारीही घेणो आवश्यक आहे. मात्र, काही क्षेत्रीय कार्यालये वगळता शहरात कोठेही ही माहिती नागरिकांना वेळोवेळी उपलब्ध करून दिली जात नाही. 
4तसेच या गाडय़ा नियमित आल्या, तरी त्यांची येण्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे नागरिकांचा कचरा साठतो आणि ते जागा मिळेल, तिथे तो टाकतात. त्यामुळे महापालिकेनेच प्रभागनिहाय या गाडय़ांचा मार्ग, त्याची निश्चित वेळ, नागरिकांर्पयत पोहचविणो आवश्यक आहे.