शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

शहर स्वच्छता अभियानाचा ‘बुमरँग’

By admin | Updated: September 5, 2014 00:39 IST

महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे.

पुणो : शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लागावी तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ राहावे, या उद्देशाने महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या लोकनेते यशवंतराव चव्हाण  स्वच्छता अभियानामुळेच शहरात काही प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याची बाब समोर येत आहे. या अभियानात क्रमांक मिळाल्यास प्रभागासाठी कोटय़ावधीचा निधी मिळत असल्याने या स्पर्धेसाठी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कोणतीही पर्यायी सुविधा न देता, शेकडो कचरा कंटेनर काढण्यात आले आहेत. परिणामी नागरिक जागा मिळेल तिथे रात्रीच्या अंधारात जागा मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. अभियानापूर्वी शहरात सुमारे 1017 कंटनेर होते. तर या अभियानात दोन वर्षात त्यांची संख्या 847 आणण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या संत गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पुणो शहरातही प्रभागांमध्ये नागरिकांच्या सहभागाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांच्या पुढाकाराने हे अभियान सुरू करण्यात आले. त्याता प्रमुख उद्देश शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरणाची शिस्त लावणो तसेच शहरातील कचरा कंटेनरची संख्या कमी करून जास्तीत जास्त नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडी मध्ये देणो परिणामी कचरा वर्गीकरणही वाढेल आणि त्यावर प्रक्रिया करणोही सोपे जाईल असा होता. या अभियानासाठी दोन कोटींपासून 75 लाखांर्पयत बक्षिसही ठेवण्यात आले. मात्र, आता या अभियानाचा उलटाच परिणाम होत असल्याचे महापालिकेच्या नुकत्याच शहरात घाणींच्या ठिकाणांचे केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशी घाण असलेली तब्बल 800 ठिकाणो शहरात आढळून आली असली तरी, त्यातील सुमारे 20 टक्के ठिकाणी या अभियानासाठी कचरा कंटेनर काढून घेतलेल्या ठिकाणची आहेत. 
कंटेनर काढला मात्र, कचरा टाकण्याची सुविधाच दिली नाही लोकसहभागासाठी असलेला लोकांचा सहभागच या अभियानातून गायब होऊन केवळ कंटेनर कमी करणो हा एकमेव उददीष्ट या अभियानाचे बनले आहे. त्या अंतर्गत या अभियानाची जबाबदारी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांकडून कचरा कंटेनर कमी करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. हे कं़टेनर काढून घेण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांना काहीच माहिती दिली जात नाही. तसेच कंटेनर काढून घेताना, त्या भागात महापालिकेचे कचरा वेचक, तसेच कचरा संकलीत करण्यासाठी येणारी घंटागाडी कधी येईल. याची कोणतीही कल्पना दिली जात नाही. त्यामुळे नागरिक काही दिवस घरातच कचरा साठवतात, आणि पर्याय नसल्याने वाढलेला कचरा रात्रीच्या अंधारात पुन्हा कंटेनर काढून घेतलेल्या जागी अथवा रिकामी जागा मिळेल तिथे टाकतात.  
 
4महापालिकेकडून कचरा कंटेनर कमी केल्यानंतर त्यांच्या परिसरात येणा:या घंटागाडय़ाचे वेळापत्रक क्षेत्रीय कार्यालयाकडून देणो आवश्यक आहे. तसेच, त्या गाडय़ा नियमित येतील, याची खबरदारीही घेणो आवश्यक आहे. मात्र, काही क्षेत्रीय कार्यालये वगळता शहरात कोठेही ही माहिती नागरिकांना वेळोवेळी उपलब्ध करून दिली जात नाही. 
4तसेच या गाडय़ा नियमित आल्या, तरी त्यांची येण्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे नागरिकांचा कचरा साठतो आणि ते जागा मिळेल, तिथे तो टाकतात. त्यामुळे महापालिकेनेच प्रभागनिहाय या गाडय़ांचा मार्ग, त्याची निश्चित वेळ, नागरिकांर्पयत पोहचविणो आवश्यक आहे.