शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:29 IST

पिंपरी-चिंचवड शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो त्या धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात शिल्लक राहिला

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो त्या धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात शिल्लक राहिला आहे़ त्या पाण्यात पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना गुजराण करावी लागणार असल्याने पालिका प्रशासन दिवसाआड पाणी सोडण्याचे धोरण ठरविणार आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे़ मात्र, रहाटणी परिसरात मागील काही दिवसांपासून अघोषित पाणी कपात झाल्याचे दिसून येत आहे. जो पाणीपुरवठा होत आहे तोही दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकवेळा पालिकेच्या संबंधित विभागाशी तक्रार करूनही यात बदल होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. रहाटणी परिसरातील दूषित पाणीपुरवठा थांबणार कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात कमी दाबाने व रात्री उशिरापण दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे़ तर काहींना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. रहाटणी परिसरात दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो़ मात्र, तोही मुबलक नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित व दुर्गंधीयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिक पोटाच्या विकाराने हैराण झाले आहेत. काही नागरिकांना उलट्या, जुलाब, ताप, खोकला यासह अनेक आजाराने नागरिकांच्या रांगा रुग्णालयात आढळून येत आहेत. रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरूंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील व राज्याच्या बाहेरून अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत़ भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घर काम करतात़ यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे. नखातेवस्ती, रामनगर, शिवराजनगर, सिद्धार्थनगर, महात्मा फुले कॉलनी, सायली पार्क १, २ तसेच रहाटणी गावठाण या भागात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठ, नऊनंतर उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. पाण्यासाठीचा हा त्रास कधी संपेल असा, उद्विग्न सवाल रहाटणीकर करत आहेत.(वार्ताहर)>विद्युतपंप बंद करण्याची मागणी सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन विचार करीत आहे़ मात्र, रहाटणी परिसरात अघोषित कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली असल्याने, नागरिक हवालदिल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना कामावर दांडी मारून पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. अनेक नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात पाणी घेण्यासाठी नळाला विद्युतपंप वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकाडे विद्युतपंप नाही त्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या घरातील विद्युतपंप जप्त करणे गरजेचे आहे़ जेणे करून सर्वांना समान पाणीपुरवठा होईल, आशी मागणी नागरिक करीत आहेत. एखाद्या वेळी पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित झाला तर उच्च दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत मोटारी जप्त करणे काळाची गरज आहे. मात्र, पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.