शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

चुकांमुळे चीन, पाकची डोकेदुखी

By admin | Updated: April 7, 2017 00:57 IST

नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले.

पुणे : नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले. त्यामुळेच आज चीन आणि पाकिस्तान भारताच्या सुरक्षेमध्ये बाधा निर्माण करत आहे, असे मत ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास सोहनी यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या विजय खरे लिखित सहा पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी डॉ. सोहनी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दलित साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रावसाहेब कसबे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते. सोहनी म्हणाले, ‘‘भारताच्या स्वातंत्र्यानंतर परराष्ट्रधोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण धोरणांविषयी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत राजीनामा दिला होता. त्याच धोरणांमुळे आज चीन, पाकिस्तानसारख्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली, कारण ते उत्तम प्रशासक होते. केवळ न्याय व्यवस्थेसंदर्भात त्यांचा अभ्यास नव्हता तर परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील धोरणांचे ते गाढे अभ्यासक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जी नीती अवलंबली होती, तशी नीती राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात वापरायला हवी हा त्यांचा आग्रह होता. (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विकसित भारत हवा होता. देशात सामाजिक आणि आर्थिक समता असावी, असा त्यांचा आग्रह होता. देशाच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, अशी त्यांची धारणा होती. साहित्याच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे अनेक पैलू समोर आले आहेत. मात्र, त्यांचे काही महत्त्वाचे पैलू जनतेसमोर येण्याची गरज आहे, त्यावर अद्याप लिखाण झालेले नाही. - डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठभूषण गोखले म्हणाले, समाजातील आर्थिक विषमता वाढल्याने कमकुवतपणा देशाला येऊ शकतो. बाबासाहेबांच्या संरक्षणात्मक विचारांचा वापर हा देशाच्या राष्ट्रीय संरक्षणासाठी करणे गरजेचे आहे.