शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

मिरचीने बळीराजा झाला समृद्ध

By admin | Updated: April 4, 2017 04:02 IST

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची

शौकत शेख,डहाणू- डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची, आरची मिरची आणी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. येथून दररोज २०० टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकला आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात त्यामुळे लक्ष्मी नांदत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदर पट्टीच्या चिंचणी, तणाशी, बावडा, कोटीम, केतखाडी, डेहणे, चंद्रनगर, आसनगाव, चंडीगाव, साखरे, वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे आदी भागातील शेतकरी काही वर्षापूर्वी फक्त गवताचे उत्पादन घेत होते. नंतर ते आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे येथील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले होते. त्यात आता मिरचीची भर पडली आहे.पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गवताळ जमीनीवर पडवळ, दुधी, तोंडली, कारली, टोमँटो, भेंडी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. मात्र यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यानी मिरची उत्पादनाचा पर्याय निवडला. या संकरीत बियाणांच्या उत्पादनाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचा फारसा धोका नाही. एखादा रोग पडल्यास त्याचा इलाज करता येतो. तर ठिबक सिंचनाचा वापर करूनही जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणता येते. त्यामुळे शेतकरी मिरचीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तर मिरची खुडणे,भरणे इत्यादी कामांतून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.याबाबत वाढवण येथील प्रभाकर पाटील या शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या २२ एकर वाडीमध्ये आम्ही फक्त भात हेच पीक घेत होतो. परंतु मी भोपळी मिरचीची लागवड केली असून दररोज एक टन सिमलाचे उत्पादन घेत आहे. >सिमलाही जोरातभोपळी मिरची दररोज वापी तसेच मुंबईला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरीवर्ग तरी भाजीपाला उत्पादनाकडे वळल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र वाढवण बंदर या भागात झाले तर येथील बागायती नष्ट होणार असल्याने बागायतदारांचा वाढवण बंदराला ठाम विरोध आहे.