शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीने बळीराजा झाला समृद्ध

By admin | Updated: April 4, 2017 04:02 IST

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची

शौकत शेख,डहाणू- डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची, आरची मिरची आणी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. येथून दररोज २०० टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकला आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात त्यामुळे लक्ष्मी नांदत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदर पट्टीच्या चिंचणी, तणाशी, बावडा, कोटीम, केतखाडी, डेहणे, चंद्रनगर, आसनगाव, चंडीगाव, साखरे, वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे आदी भागातील शेतकरी काही वर्षापूर्वी फक्त गवताचे उत्पादन घेत होते. नंतर ते आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे येथील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले होते. त्यात आता मिरचीची भर पडली आहे.पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गवताळ जमीनीवर पडवळ, दुधी, तोंडली, कारली, टोमँटो, भेंडी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. मात्र यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यानी मिरची उत्पादनाचा पर्याय निवडला. या संकरीत बियाणांच्या उत्पादनाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचा फारसा धोका नाही. एखादा रोग पडल्यास त्याचा इलाज करता येतो. तर ठिबक सिंचनाचा वापर करूनही जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणता येते. त्यामुळे शेतकरी मिरचीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तर मिरची खुडणे,भरणे इत्यादी कामांतून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.याबाबत वाढवण येथील प्रभाकर पाटील या शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या २२ एकर वाडीमध्ये आम्ही फक्त भात हेच पीक घेत होतो. परंतु मी भोपळी मिरचीची लागवड केली असून दररोज एक टन सिमलाचे उत्पादन घेत आहे. >सिमलाही जोरातभोपळी मिरची दररोज वापी तसेच मुंबईला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरीवर्ग तरी भाजीपाला उत्पादनाकडे वळल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र वाढवण बंदर या भागात झाले तर येथील बागायती नष्ट होणार असल्याने बागायतदारांचा वाढवण बंदराला ठाम विरोध आहे.