शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

मिरचीने बळीराजा झाला समृद्ध

By admin | Updated: April 4, 2017 04:02 IST

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची

शौकत शेख,डहाणू- डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची, आरची मिरची आणी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. येथून दररोज २०० टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकला आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात त्यामुळे लक्ष्मी नांदत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदर पट्टीच्या चिंचणी, तणाशी, बावडा, कोटीम, केतखाडी, डेहणे, चंद्रनगर, आसनगाव, चंडीगाव, साखरे, वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे आदी भागातील शेतकरी काही वर्षापूर्वी फक्त गवताचे उत्पादन घेत होते. नंतर ते आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे येथील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले होते. त्यात आता मिरचीची भर पडली आहे.पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गवताळ जमीनीवर पडवळ, दुधी, तोंडली, कारली, टोमँटो, भेंडी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. मात्र यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यानी मिरची उत्पादनाचा पर्याय निवडला. या संकरीत बियाणांच्या उत्पादनाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचा फारसा धोका नाही. एखादा रोग पडल्यास त्याचा इलाज करता येतो. तर ठिबक सिंचनाचा वापर करूनही जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणता येते. त्यामुळे शेतकरी मिरचीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तर मिरची खुडणे,भरणे इत्यादी कामांतून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.याबाबत वाढवण येथील प्रभाकर पाटील या शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या २२ एकर वाडीमध्ये आम्ही फक्त भात हेच पीक घेत होतो. परंतु मी भोपळी मिरचीची लागवड केली असून दररोज एक टन सिमलाचे उत्पादन घेत आहे. >सिमलाही जोरातभोपळी मिरची दररोज वापी तसेच मुंबईला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरीवर्ग तरी भाजीपाला उत्पादनाकडे वळल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र वाढवण बंदर या भागात झाले तर येथील बागायती नष्ट होणार असल्याने बागायतदारांचा वाढवण बंदराला ठाम विरोध आहे.