शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीने बळीराजा झाला समृद्ध

By admin | Updated: April 4, 2017 04:02 IST

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची

शौकत शेख,डहाणू- डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास ४० गावात यंदा शेतकऱ्यांकडून सुमारे साडे सहा हजार एकरात भोपळी मिरची, आरची मिरची आणी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. येथून दररोज २०० टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकला आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वापी येथे मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात त्यामुळे लक्ष्मी नांदत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदर पट्टीच्या चिंचणी, तणाशी, बावडा, कोटीम, केतखाडी, डेहणे, चंद्रनगर, आसनगाव, चंडीगाव, साखरे, वरोर, वाढवण, बाडापोखरण, तिडयाळे, ऐना, रणकोळ, कासा, सायवन, वानगाव, खंबाळे आदी भागातील शेतकरी काही वर्षापूर्वी फक्त गवताचे उत्पादन घेत होते. नंतर ते आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे येथील प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले होते. त्यात आता मिरचीची भर पडली आहे.पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गवताळ जमीनीवर पडवळ, दुधी, तोंडली, कारली, टोमँटो, भेंडी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. मात्र यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यानी मिरची उत्पादनाचा पर्याय निवडला. या संकरीत बियाणांच्या उत्पादनाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचा फारसा धोका नाही. एखादा रोग पडल्यास त्याचा इलाज करता येतो. तर ठिबक सिंचनाचा वापर करूनही जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणता येते. त्यामुळे शेतकरी मिरचीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तर मिरची खुडणे,भरणे इत्यादी कामांतून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे.याबाबत वाढवण येथील प्रभाकर पाटील या शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या २२ एकर वाडीमध्ये आम्ही फक्त भात हेच पीक घेत होतो. परंतु मी भोपळी मिरचीची लागवड केली असून दररोज एक टन सिमलाचे उत्पादन घेत आहे. >सिमलाही जोरातभोपळी मिरची दररोज वापी तसेच मुंबईला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरीवर्ग तरी भाजीपाला उत्पादनाकडे वळल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने हजारो मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र वाढवण बंदर या भागात झाले तर येथील बागायती नष्ट होणार असल्याने बागायतदारांचा वाढवण बंदराला ठाम विरोध आहे.