शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

पालिकेचे कंत्राटदाराला संरक्षण

By admin | Updated: April 30, 2016 03:05 IST

अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती.

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती. साडेतीन वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने अनेकवेळा स्मशानभूमीचे काम बंदही केले होते. असे असतांनाही पालिका प्रशासन कंत्राटदाराची बाजू घेत आहे. एवढेच नव्हे तर या कामाला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीचेच काम पूर्ण झालेले नसतांना पुन्हा नव्याने ४५ लाखाची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटदाराला काम करण्यास विलंब झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला मुदतवाढ देण्याचा घाट पालिका प्रशासन करत आहे.अंबरनाथची लोकसंख्या वाढल्याने जुन्या स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडत होता. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१० मध्ये प्रशासनाने जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. या कामाला तांत्रिक मंजुरी घेतल्यावर १६ जुलै २०१२ मध्ये काम सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले. सागर कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले होते. या नूतनीकरणाच्या कामासाठी ९४ लाख ६३ हजाराची तरतूद केली. त्यातील ९१ लाख २५ हजार आत्तापर्यंत खर्चही झाले. जी तरतूद केली होती त्यातील ९६ टक्के निधी खर्च झालेला असतांनाही प्रत्यक्षात स्मशानभूमीचे काम मात्र अर्धवटच राहिले. मूळ निविदेत जी कामे प्रस्तावित केली होती ती कामे पूर्ण केलेली नाही. अर्धवट परिस्थितीत स्मशानभूमी असतांनाही या कामाचे बिल मात्र थांबविलेले नाही. कामाची पाहणी न करताच बिले दिली. या ठिकाणी केलेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. असे असतानाही कंत्राटदाराला पाठिशी घालत पालिकेने टप्प्याटप्प्याने बिले काढली आहेत. काम अर्धवट असताना उर्वरित कामासाठी पालिकेने नव्याने ४५ लाखाची तरतूद केली आहे. जी कामे पूर्वीच्या निविदेतून करणे अपेक्षित होते, तेच कामे पूर्ण करण्यासाठी नवी तरतूद करुन या कामामध्ये गैरकारभार करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. कंत्राटदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासन या कंत्राटदाराला सांभाळून घेण्यासाठी आटापिटा करत आहे. (प्रतिनिधी)>सहा महिन्यांपूर्वी झाले होते सुशोभिकरणस्मशानभूमीच्या नूतनीकरण कामाचे आदेश देण्याच्या सहा महिनेआधीही याच स्मशानभूमीमध्ये सुशोभिकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे झाले आहे. तसेच स्मशानभूमीचे काम सुरु असतानाही पालिकेने याच ठिकाणी अनेक नवीन कामे केली आहेत. त्यांची बिले देखील काढली आहेत. असे असताना पुन्हा ४५ लाखाची तरतूद करुन पालिका स्मशानभूमीच्या कामात गैरकारभाराची मुहुर्तमेढ रोवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात अधिकारी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.>विलंबाची जबाबदारी पालिकेने घेतलीदंड लावणे तर दूरच त्या कंत्राटदाराला मुदतवाढ देता यावी यासाठी कामाला झालेल्या विलंबाची जबाबदारी पालिकेने स्वत:वर घेतली आहे. स्मशानभूमीचा वापर होत असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे कारणही सोबत जोडले आहे. ठेकेदाराला सांभाळून घेण्यासाठी पालिकेने केलेला हा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीत मानवी हाडे सापडत असल्याने पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे आहे असेही कारण दिले आहे. स्मशानभूमीत कामासाठी खोदकाम करताना मानवी हाडे सापडणे हे सर्वज्ञात आहे.