शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

पालिकेचे कंत्राटदाराला संरक्षण

By admin | Updated: April 30, 2016 03:05 IST

अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती.

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती. साडेतीन वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने अनेकवेळा स्मशानभूमीचे काम बंदही केले होते. असे असतांनाही पालिका प्रशासन कंत्राटदाराची बाजू घेत आहे. एवढेच नव्हे तर या कामाला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीचेच काम पूर्ण झालेले नसतांना पुन्हा नव्याने ४५ लाखाची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटदाराला काम करण्यास विलंब झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला मुदतवाढ देण्याचा घाट पालिका प्रशासन करत आहे.अंबरनाथची लोकसंख्या वाढल्याने जुन्या स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडत होता. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१० मध्ये प्रशासनाने जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. या कामाला तांत्रिक मंजुरी घेतल्यावर १६ जुलै २०१२ मध्ये काम सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले. सागर कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले होते. या नूतनीकरणाच्या कामासाठी ९४ लाख ६३ हजाराची तरतूद केली. त्यातील ९१ लाख २५ हजार आत्तापर्यंत खर्चही झाले. जी तरतूद केली होती त्यातील ९६ टक्के निधी खर्च झालेला असतांनाही प्रत्यक्षात स्मशानभूमीचे काम मात्र अर्धवटच राहिले. मूळ निविदेत जी कामे प्रस्तावित केली होती ती कामे पूर्ण केलेली नाही. अर्धवट परिस्थितीत स्मशानभूमी असतांनाही या कामाचे बिल मात्र थांबविलेले नाही. कामाची पाहणी न करताच बिले दिली. या ठिकाणी केलेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. असे असतानाही कंत्राटदाराला पाठिशी घालत पालिकेने टप्प्याटप्प्याने बिले काढली आहेत. काम अर्धवट असताना उर्वरित कामासाठी पालिकेने नव्याने ४५ लाखाची तरतूद केली आहे. जी कामे पूर्वीच्या निविदेतून करणे अपेक्षित होते, तेच कामे पूर्ण करण्यासाठी नवी तरतूद करुन या कामामध्ये गैरकारभार करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. कंत्राटदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासन या कंत्राटदाराला सांभाळून घेण्यासाठी आटापिटा करत आहे. (प्रतिनिधी)>सहा महिन्यांपूर्वी झाले होते सुशोभिकरणस्मशानभूमीच्या नूतनीकरण कामाचे आदेश देण्याच्या सहा महिनेआधीही याच स्मशानभूमीमध्ये सुशोभिकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे झाले आहे. तसेच स्मशानभूमीचे काम सुरु असतानाही पालिकेने याच ठिकाणी अनेक नवीन कामे केली आहेत. त्यांची बिले देखील काढली आहेत. असे असताना पुन्हा ४५ लाखाची तरतूद करुन पालिका स्मशानभूमीच्या कामात गैरकारभाराची मुहुर्तमेढ रोवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात अधिकारी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.>विलंबाची जबाबदारी पालिकेने घेतलीदंड लावणे तर दूरच त्या कंत्राटदाराला मुदतवाढ देता यावी यासाठी कामाला झालेल्या विलंबाची जबाबदारी पालिकेने स्वत:वर घेतली आहे. स्मशानभूमीचा वापर होत असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे कारणही सोबत जोडले आहे. ठेकेदाराला सांभाळून घेण्यासाठी पालिकेने केलेला हा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीत मानवी हाडे सापडत असल्याने पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे आहे असेही कारण दिले आहे. स्मशानभूमीत कामासाठी खोदकाम करताना मानवी हाडे सापडणे हे सर्वज्ञात आहे.