शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार

By admin | Updated: October 17, 2016 13:02 IST

'31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा'.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. '31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा', असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुणे महानगरापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिका-यांनी बदली करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला आहे. महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल करत,'सत्ताधारी मंत्री जिल्हाधिका-यांना सालगडी समजतात का?, असा प्रश्नदेखील अजित पवार यांनी उपस्थित केला. 
 
आणखी बातम्या
 
तसेच,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी 'मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करत आहे, दुसरे काही नाही' असे अजित पवार यांनी म्हटले. 'पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नसल्याने बलात्काराचे प्रकार वाढत आहेत.  लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत असल्याचे कारण देखील तेच आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्या, अशी मागणी देखील अजित पवार यांनी यावेळी केली आहे.