शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
7
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
8
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
9
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
10
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
13
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
14
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
15
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
16
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
17
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
18
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
19
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
20
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी समजावला सरसकट कर्जमाफीचा अर्थ, 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

By admin | Updated: July 9, 2017 11:05 IST

मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा अर्थ समजावून सांगितला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यापासून या घोषणेतील सरसकट आणि तत्त्वत: या शब्दांवरून बराच गोंधळ उडाला आहे. अखेर आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा अर्थ समजावून सांगितला. देशातील इतर राज्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना विविध अटी शर्ती लादल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात कर्जमाफीची घोषणा करताना आम्ही या सगळ्या अटी काढून टाकत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीमुळे 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यावेळी सरसकट कर्जमाफीबाबत ते म्हणाले की, "सुरुवातीला आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. पण नंतर इतर शेतकऱ्यांचाही प्रश्न पुढे आला. त्यानंतर आम्ही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला.  देशातील विविध राज्यांनी वेगवेगळ्या अटी घालून कर्जमाफी दिली आहे.  एकीकडे पंजाबने  5 एकरपर्यंत जमीन असलेल्यांना, तेलंगणाने, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कर्नाटकने केवळ जिल्हा बँकेतून कर्ज घेणाऱ्यांना तर आंध्र प्रदेशने दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना कर्जमाफी दिली आहे. मात्र राज्य सरकारने कोणत्याही अटी शर्ती न घालता कर्जमाफीची घोषणा केली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी आहे." मात्र राज्याची आर्थिक कुवत पाहता संपूर्ण कर्ज माफ करणे शक्य नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देण्यासाठी 25 हजार किंवा 25 टक्के रकमेचे अनुदान दिल्याचे सांगितले. तसेच या शेतकऱ्यांना भविष्यात विविध योजनांचा प्राधान्यक्रमाने लाभ दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांपैकी 82 टक्के शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले आहे. तसेच चुकीच्या लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी खबरदारी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 
"शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतीक्षेत्रातील गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र दुष्काळ झेलत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज होती. आता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना आणल्या जातील. त्यासाठी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.