शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

पहिल्या चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर !

By admin | Updated: December 7, 2014 02:19 IST

भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्याच चहापानाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गैरहजर राहणार आहेत.

विरोधकांनी घेतला समाचार
मुंबई : भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्याच चहापानाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गैरहजर राहणार आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ताधा:यांच्या या गैरहजेरीचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या वाटेवर नेऊ नका, अशा शब्दांत विरोधकांनी टीका केली आहे.
राज्याच्या काही प्रथा-परंपरा आहेत़ आम्हीही सत्तेत होतो, त्या वेळी एकदाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चहापानाला गैरहजेरी लावली नाही. उलट विरोधकच या चहापानाला गैरहजर राहात होते. पंतप्रधानांनी बैठक ठेवली आहे, त्यामुळे आपण चहापानाला हजर राहू शकत नाही़ मात्र आपण या, संसदीय कार्यमंत्री आपले स्वागत करतील, असे पत्र विरोधकांना पाठवण्याची घटना राज्यात कधी घडली नव्हती. हा उघडपणो केलेला अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 
ते म्हणाले, बैठक कधी ठेवावी हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. सरकारकडे विमान असते. नागपूर, दिल्लीत विमानतळं आहेत. पंतप्रधानांची बैठक दुपारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम सकाळी ठेवायचा व सरकारी विमानाने दिल्लीला जाऊन परत यायचे असते. मात्र असा अवमान करण्याची गरज नव्हती, असेही अजित पवार म्हणाले. चहापानाची परंपरा मोडीत काढून राज्याची वाटचाल गुजरातच्या दिशेने चालू आहे असे संतप्त विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. मी मुख्यमंत्री असताना कितीही व्यस्त असलो तरी चहापानाचा कार्यक्रम कधीही टाळला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून अधिवेशन कसे चालावे याविषयी चर्चा करण्यासाठी चहापान आयोजित केले जाते मात्र पत्र पाठवून स्वत:च गैरहजर राहणो हे तर फार झाले अशा शब्दात काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणजे खूप काही मिळवले अशा भ्रमात सरकारने राहू नये. निदान फडणवीस यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती असेही ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)