शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नाना’च्या नावाने फसवणूक

By admin | Updated: February 6, 2016 03:47 IST

‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे

नाशिक : ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘नाम’ची मदत मिळालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाना पाटेकर यांचे नाव सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार झाल्याचे खुद्द मकरंद अनासपुरे यानेच नाशिकमध्ये सांगितले.औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना काही भामट्यांनी फोन केले. ‘तुम्हाला मदत म्हणून मिळालेल्या १५ हजारांपैकी तीन हजार रुपये अमुक खात्यावर जमा करा. तसे केल्यास नाना पाटेकर हे स्वत:च्या खात्यातून तुम्हाला पुन्हा एक लाख रुपयांची मदत देणार आहेत’, असे या कुटुंबांना सांगण्यात आले. अशा प्रकारे सहा कुटुंबांकडून पैसे उकळण्यात हे भामटे यशस्वी झाले; मात्र सातव्या वेळेला पकडले गेले. त्यामुळे नागरिकांनी फक्त ‘नाम’च्या अधिकृत खात्यावरच रक्कम जमा करावी व कोणाकडून रक्कम भरण्यासाठीचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनासपुरेने केले. नाम कोणाकडूनही रोख पैसे स्वीकारत नसून, केवळ ‘नाम’च्या अधिकृत खात्यावर धनादेश व अधिकर्षाद्वारेच पैसे स्वीकारले जातात. नानांच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे सगळे मेसेज बनावट आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्याने स्पष्ट केले.नाम फाउंडेशनच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी जिल्ह्यातील ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी सुपूर्द केले. नाना पाटेकर म्हणाला, नुसते पाणी अडवा, पाणी जिरवा करून भागणार नाही, तर गावातून शहराकडे जाणारी मुले अडवा आणि त्यांना गावातच जिरवा. कारण ही मुले नव्या पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू शकतात. जुनी मंडळी तेवढ्या क्षमतेने हे करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ पुरी पडणार नाही. पण यानिमित्ताने आम्ही सरकारपुढे एक मॉडेल सादर केले. काही यंत्रणा नसताना आम्ही एवढे करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा जाब आता विचारू शकतो.‘तिला का उठवलं?’एका महिलेचे बाळ रडू लागल्याने स्वयंसेवकाने तिला उठून मागे जायला सांगितले. नानाने ते टिपून लगेच त्या स्वयंसेवकाला ‘तिला का उठवलं’ असा जाब विचारला. त्याने ‘बाळ रडत होतं’ असे उत्तर देताच ‘मग रडू दे की’ म्हणत त्या महिलेला नाना व मकरंद यांनी पुन्हा बसायला सांगितले. एका स्वयंसेवकाने शेतकऱ्याला ढकलल्याचे पाहूनही नाना चांगलाच संतापले. पाच लाख देतो, कार्यक्रमाला या... : आम्हाला वैयक्तिक पैसे नको. अनेकांचे फोन येतात. पाच लाख रुपये मदत देतो, आमच्या कार्यक्रमाला याल का, अशी विचारणा होते. हे गंभीर कार्य आहे. अगदी साहित्य संमेलनात एक कोटी रुपयांची मदत देऊनही ती स्वीकारण्यास ‘नाम’चा प्रतिनिधी नव्हता, हे मकरंद यांनी नमूद केले.