शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘नाना’च्या नावाने फसवणूक

By admin | Updated: February 6, 2016 03:47 IST

‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे

नाशिक : ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘नाम’ची मदत मिळालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाना पाटेकर यांचे नाव सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार झाल्याचे खुद्द मकरंद अनासपुरे यानेच नाशिकमध्ये सांगितले.औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना काही भामट्यांनी फोन केले. ‘तुम्हाला मदत म्हणून मिळालेल्या १५ हजारांपैकी तीन हजार रुपये अमुक खात्यावर जमा करा. तसे केल्यास नाना पाटेकर हे स्वत:च्या खात्यातून तुम्हाला पुन्हा एक लाख रुपयांची मदत देणार आहेत’, असे या कुटुंबांना सांगण्यात आले. अशा प्रकारे सहा कुटुंबांकडून पैसे उकळण्यात हे भामटे यशस्वी झाले; मात्र सातव्या वेळेला पकडले गेले. त्यामुळे नागरिकांनी फक्त ‘नाम’च्या अधिकृत खात्यावरच रक्कम जमा करावी व कोणाकडून रक्कम भरण्यासाठीचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनासपुरेने केले. नाम कोणाकडूनही रोख पैसे स्वीकारत नसून, केवळ ‘नाम’च्या अधिकृत खात्यावर धनादेश व अधिकर्षाद्वारेच पैसे स्वीकारले जातात. नानांच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे सगळे मेसेज बनावट आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्याने स्पष्ट केले.नाम फाउंडेशनच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी जिल्ह्यातील ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी सुपूर्द केले. नाना पाटेकर म्हणाला, नुसते पाणी अडवा, पाणी जिरवा करून भागणार नाही, तर गावातून शहराकडे जाणारी मुले अडवा आणि त्यांना गावातच जिरवा. कारण ही मुले नव्या पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू शकतात. जुनी मंडळी तेवढ्या क्षमतेने हे करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ पुरी पडणार नाही. पण यानिमित्ताने आम्ही सरकारपुढे एक मॉडेल सादर केले. काही यंत्रणा नसताना आम्ही एवढे करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा जाब आता विचारू शकतो.‘तिला का उठवलं?’एका महिलेचे बाळ रडू लागल्याने स्वयंसेवकाने तिला उठून मागे जायला सांगितले. नानाने ते टिपून लगेच त्या स्वयंसेवकाला ‘तिला का उठवलं’ असा जाब विचारला. त्याने ‘बाळ रडत होतं’ असे उत्तर देताच ‘मग रडू दे की’ म्हणत त्या महिलेला नाना व मकरंद यांनी पुन्हा बसायला सांगितले. एका स्वयंसेवकाने शेतकऱ्याला ढकलल्याचे पाहूनही नाना चांगलाच संतापले. पाच लाख देतो, कार्यक्रमाला या... : आम्हाला वैयक्तिक पैसे नको. अनेकांचे फोन येतात. पाच लाख रुपये मदत देतो, आमच्या कार्यक्रमाला याल का, अशी विचारणा होते. हे गंभीर कार्य आहे. अगदी साहित्य संमेलनात एक कोटी रुपयांची मदत देऊनही ती स्वीकारण्यास ‘नाम’चा प्रतिनिधी नव्हता, हे मकरंद यांनी नमूद केले.