मुंबई : लोकसभा निवडणुकीने काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रचंड डॅमेज केले आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आधी तीन-चार महिन्यांत डॅमेज कंट्रोल करण्याची इच्छाशक्ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दिसत नाही, अशी खरमरीत टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली. लोकसभा निवडणुकीत नेमका कशाचा फटका राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्याचे नेतृत्व प्रतिमा जपण्याच्या नादात होते. त्याने काय साधले गेले? उपमुख्यमंत्री ताकद देतील असे वाटले होते तेही झाले नाही. आता उरलेल्या चार महिन्यांत काही होईल, असे मला अजिबात वाटत नाही. शेवटच्या वर्षभरात केंद्र सरकार आहे की नाही, असे चित्र होते त्याचाही फटका बसला. लोकाभिमुख निर्णय लोकांपर्यंत नीट पोहोचतील कसे, आधी असे निर्णय झाले तर पाहिजेत ना! राष्ट्रवादीचे आमचे छोटे दुकान आहे; पण केंद्र आणि राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्ष संपविला. इतरांची फरफट केली, असे भुजबळ म्हणाले. राज्यातील इतर काही मंत्र्यांनी नेमका फटका कुठे बसला हे सांगितले. अनेक महत्त्वाचे लोकाभिमुख निर्णय राज्य व केंद्र सरकारने घेतले; पण प्रसिद्धी माध्यमांतून ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. उलट विरोधकांनी नकारात्मक बाजू पोहोचविली, अशी खंत बहुतेक (पान ६ वर)
चव्हाण, अजित पवारांवर भुजबळांनी डागली तोफ
By admin | Updated: May 21, 2014 09:11 IST