शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

२५ कोटींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल होणार

By admin | Updated: April 9, 2017 00:23 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या तीन जिल्हा शाखांमधून काढण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या तीन जिल्हा शाखांमधून काढण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेने शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील आ. रमेश कदम हे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहेत. या घोटाळ्यात बुलडाणा, जालना आणि भंडारा येथील साठे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या खात्यातून २५ कोटी रुपये काढण्यात आले होते. ही रक्कम महामंडळाच्या मुंबई मुख्यालयांतून या जिल्हा कार्यालयाच्या खात्यांमध्ये वळती करण्यात आली आणि नंतर ती जिल्हा कार्यालयांनी काढून घेतली. या रकमेचा अपहार झाला. मुंबईतून आलेल्या काही लोकांनी बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिली व ही रक्कम घेऊन पोबारा केला, अशाही तक्रारी नंतरच्या काळात झाल्या. सीआयडीने या प्रकरणी सखोल चौकशी केली. त्यानंतर सदर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी सीआयडीने राज्यपालांना मागितली. ‘माझी परवानगी घेण्याच्या आधी राज्य मंत्रिपरिषदेची मान्यता घेतली आहे काय, अशी विचारणा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली. त्यावर, शासनात धावपळ उडाली आणि काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिपरिषदेची मान्यता घेण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)