शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तीन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

By admin | Updated: October 14, 2016 02:41 IST

कोट्यवधींच्या रस्ते घोटाळा प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) हे आरोपपत्र दाखल करण्यात आले

मुंबई : कोट्यवधींच्या रस्ते घोटाळा प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली पाहावयास मिळते.किल्ला कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत ६२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यात २५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेच्या दक्षता विभागाचे माजी मुख्य अभियंता अशोक पवार, उदय मुरूडकर, कार्यकारी अभियंता किशोर येरमे, ठेकेदार दीपन शाह (रेल्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट) आणि १० लेखापाल कंपनीचा समावेश आहे. ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे होते. ही मुदत संपत असल्याने प्राथमिक स्वरूपात पहिले तिघांविरुद्ध ३५० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी जर वेळीच त्यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले नसते तर ते यातून सुटले असते, असे शर्मा यांनी सांगितले. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, पवारने यात आपला सहभाग नसल्याचे सांगितले. मात्र त्यांनी लेखापाल आणि ठेकेदारांसोबत संगनमताने कट रचल्याचे स्पष्ट होते. यातील पवार यांनी रस्त्यांवर अनेक वेळा भेट देत त्यांची अवस्था चांगली असल्याचे नमूद केले होते. त्या रेकॉर्डचाही यात समावेश आहे. याबाबत खुलासा करणे पवार यांना शक्य झाले नाही. तर मुरूडकरनेही यापैकी एकाही रस्त्यावर भेट न देता सह्या केल्या आहेत. यापैकी गुन्हा दाखल असलेले पालिका कार्यकारी अभियंता वी.वी. अचरेकरचाही यात समावेश आहे. मात्र तो सध्या अंतरिम जामिनावर आहे. या अधिकाऱ्यांनी साइटवर न जाता त्याचे अहवाल चुकीचे असताना ते योग्य असल्याचे दर्शविले. शिवाय त्याची बिले, तसेच बनावट जागेची पाहणी, मापन पुस्तकाचा अहवाल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)