भिवंडी : शहरातील नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला असून इतर 9जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने डोंगरावर राहाणा:या कुटुंबांमध्ये घबराट पसरलेली आहे.
मंगळवारी दुपारी 3 वाजता झालेल्या या दुर्घटनेत सात घरांचे नुकसान झाले असून सृष्टी प्रशांत इनामके ही आठ वषार्ंची मुलगी जागीच मृत्यू पावली. तर सत्तार शहानूर पठाण (46), रामभवन मंगरू मौर्या (18), सुनीत रामजल मौर्या (18), पूजा घनश्याम यादव (13), कल्पना प्रशांत इनामके (28), राजकुमारी घनश्याम यादव (35), अशोककुमार श्रीराम गौतम (21), किरणदेवी रामदेव गौतम (35), शांतीदेवी रामदेव गौतम (2) असे 9 जण जखमी असून त्यांच्यावर स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गायत्रीनगरमध्ये वसलेल्या सर्व झोपडय़ा व पक्की घरे वन खात्याच्या जागेवर असून शहरांत अशा सर्व अवैध झोपडपट्टींची वसाहत नगरसेवकांनी आपल्या मतांसाठी वसवलेली आहे. त्यामुळे या अवैध व धोकादायक वसाहतींवर पालिका प्रशासन कारवाई करीत नाही. मात्र अशा अपघातांना शासन व प्रशासनाच्या अधिका:यांना सामोरे जावे लागते. या घटनेमुळे डोंगरावर वसलेल्या वसाहतीत घबराट पसरली असून, नुकत्याच घडलेल्या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल की काय, असा धसका येथील नागरिकांनी घेतला आहे. घटनास्थळी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. (प्रतिनिधी)