शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

‘एसएससी’ परीक्षेच्या पद्धतीत होणार बदल

By admin | Updated: December 28, 2014 00:37 IST

आगामी काळात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) आपल्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करू शकते. शनिवारी या बाबीचे संकेत कमिशनचे अध्यक्ष ए. भट्टाचार्य यांनी दिले.

विद्यार्थ्यांशी संवाद : आयोगाचे अध्यक्ष भट्टाचार्य यांचे संकेतनागपूर : आगामी काळात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) आपल्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करू शकते. शनिवारी या बाबीचे संकेत कमिशनचे अध्यक्ष ए. भट्टाचार्य यांनी दिले. शनिवारी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) चे डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या अंबाझरी रोडवरील गुरुनानक सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एसएससी’चे अध्यक्ष ए. भट्टाचार्य होते. त्यांच्या सोबत ‘एसएससी’ च्या पश्चिम विभगाचे प्रादेशिक संचालक के. बी. जगताप, डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंगचे संचालक जे. वैद्यनाथन आणि सचिव मनीषा भटनागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ‘एसएससी’च्या चमू शिवाय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, उपनिवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे आणि कोचिंग सेंटरचे संचालक डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भट्टाचार्य यांनी नव्या बदलांच्या मागे असलेली संभाव्य कारणे स्पष्ट केली. एसएससीच्या परीक्षेत राज्यांच्या अनुशेषाला दूर करण्याच्या उद्देशानेही बदल होऊ शकतो. सध्या एसएससीच्या परीक्षात महाराष्ट्राची टक्केवारी कमी आहे. भट्टाचार्य यांच्या मते एसएससीतर्फे आयोजित परीक्षात महाराष्ट्राचे केवळ २ टक्केच विद्यार्थी सामील होत असल्यानेही टक्केवारी वाढविण्यात येणार आहे. या दिशेने आणखी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे संकेत भट्टाचार्य यांनी दिले.(प्रतिनिधी)एकसारखी असावी प्रश्नपत्रिकाकार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘एसएससी’च्या अधिकाऱ्यांना सांगितले की, आयोगाच्या परीक्षेत प्रश्न पत्रिकेचे वेगवेगळे संच असतात. चार संचात प्रश्नपत्रिका न ठेवता एकच संच असावा. परीक्षा देशभरात एकाच वेळी व्हावी. याचा फायदा विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार नाही. शंकेचे केले निरसनविद्यार्थ्यांच्या मनात ‘एसएससी’च्या परीक्षेबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. ‘एसएससी’च्या डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंगचे संचालक जे. वैद्यनाथन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येक वर्षी आयोगातर्फे विविध केंद्र सरकारी विभागात विविध पदांसाठी परीक्षांचे आयोजन करण्यात येते. जर विद्यार्थ्यांनी परीक्षेची पद्धती समजावून घेतल्यास त्यांना परीक्षा देण्यात कुठलीच अडचण येणार नाही. सचिव मनिषा भटनागर यांनी विद्यार्थ्यांबद्दल काय शक्यता आहेत हे स्पष्ट केले. सोबतच त्यांना मिळणाऱ्या सुविधांचीही माहिती दिली.