शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘पीटीए’ निवड समिती प्रक्रियेत बदल करा

By admin | Updated: May 21, 2017 02:17 IST

खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी, सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत पालक प्रतिनिधींनी शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशन’ (पीटीए) स्थापन करण्याच्या नियमांत बदल करा, असा मुख्य मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था (शुल्क विनिमय अधिनियम २०११) बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी शुक्रवारी पहिली बैठक घेण्यात आली. पुढच्या महिन्यात दुसरी बैठक घेण्यात येणार असल्याचे पालक प्रतिनिधी सुनील चौधरी यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्याकडे आहे.शाळांना दोन वर्षांनी शुल्कवाढ करण्यास नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे, पण अनेक शाळा नियमांचे उल्लंघन करून दरवर्षी शुल्कवाढ करत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळांनी शुल्कवाढ करताना सरकारला अहवाल सादर करणे अनिवार्य असावे. शाळेसंदर्भातील निर्णयासंदर्भात मुख्याध्यापकांना दोषी धरले जाते. त्याऐवजी शाळा व्यवस्थापनाला दोषी धरण्यात यावे. शाळा व्यवस्थापनाप्रमाणेच विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे पालकांना दाद मागण्याची मुभा द्यावी, हे महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये पीटीए समिती निवड प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा पालक प्रतिनिधींनी मांडला. यापुढे प्रत्येक तुकडीतील एका पालकाची निवड शाळेच्या समितीत करावी, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आज आझाद मैदानात पालकांचे आंदोलनगेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत दरवर्षी खासगी शाळा भरमसाट शुल्कवाढ करतात. या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यासह मुंबईतील पालक एकवटले आहेत. रविवार, २१ मे रोजी आझाद मैदान येथे पालक एकत्र येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. शुल्कवाढ नियंत्रण कायद्यानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेला दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्कवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, गेल्या कित्येक वर्षांपासून शाळा सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करत आहेत. दरवर्षी वारेमाप शुल्कवाढ करताना शाळा नवीन शक्कल लढवत असतात. पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशनला (पीटीए) न जुमानता दरवर्षी शुल्कवाढ केली जाते. दरवर्षीच्या या जाचाला कंटाळून विविध शाळांतील पालक गेल्या एक महिन्यापासून लढा देत आहेत.