शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘पीटीए’ निवड समिती प्रक्रियेत बदल करा

By admin | Updated: May 21, 2017 02:17 IST

खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी, सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत पालक प्रतिनिधींनी शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशन’ (पीटीए) स्थापन करण्याच्या नियमांत बदल करा, असा मुख्य मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था (शुल्क विनिमय अधिनियम २०११) बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी शुक्रवारी पहिली बैठक घेण्यात आली. पुढच्या महिन्यात दुसरी बैठक घेण्यात येणार असल्याचे पालक प्रतिनिधी सुनील चौधरी यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्याकडे आहे.शाळांना दोन वर्षांनी शुल्कवाढ करण्यास नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे, पण अनेक शाळा नियमांचे उल्लंघन करून दरवर्षी शुल्कवाढ करत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळांनी शुल्कवाढ करताना सरकारला अहवाल सादर करणे अनिवार्य असावे. शाळेसंदर्भातील निर्णयासंदर्भात मुख्याध्यापकांना दोषी धरले जाते. त्याऐवजी शाळा व्यवस्थापनाला दोषी धरण्यात यावे. शाळा व्यवस्थापनाप्रमाणेच विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे पालकांना दाद मागण्याची मुभा द्यावी, हे महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये पीटीए समिती निवड प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा पालक प्रतिनिधींनी मांडला. यापुढे प्रत्येक तुकडीतील एका पालकाची निवड शाळेच्या समितीत करावी, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आज आझाद मैदानात पालकांचे आंदोलनगेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत दरवर्षी खासगी शाळा भरमसाट शुल्कवाढ करतात. या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यासह मुंबईतील पालक एकवटले आहेत. रविवार, २१ मे रोजी आझाद मैदान येथे पालक एकत्र येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. शुल्कवाढ नियंत्रण कायद्यानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेला दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्कवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, गेल्या कित्येक वर्षांपासून शाळा सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करत आहेत. दरवर्षी वारेमाप शुल्कवाढ करताना शाळा नवीन शक्कल लढवत असतात. पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशनला (पीटीए) न जुमानता दरवर्षी शुल्कवाढ केली जाते. दरवर्षीच्या या जाचाला कंटाळून विविध शाळांतील पालक गेल्या एक महिन्यापासून लढा देत आहेत.