शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीए’ निवड समिती प्रक्रियेत बदल करा

By admin | Updated: May 21, 2017 02:17 IST

खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी शाळांमधील शुल्क वाढ प्रकरण दरवर्षी डोके वर काढत असल्याने, पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते आहे. गेल्या काही वर्षांत फोफावत चाललेल्या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी, सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत पालक प्रतिनिधींनी शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशन’ (पीटीए) स्थापन करण्याच्या नियमांत बदल करा, असा मुख्य मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्र शिक्षण संस्था (शुल्क विनिमय अधिनियम २०११) बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी शुक्रवारी पहिली बैठक घेण्यात आली. पुढच्या महिन्यात दुसरी बैठक घेण्यात येणार असल्याचे पालक प्रतिनिधी सुनील चौधरी यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्याकडे आहे.शाळांना दोन वर्षांनी शुल्कवाढ करण्यास नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे, पण अनेक शाळा नियमांचे उल्लंघन करून दरवर्षी शुल्कवाढ करत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळांनी शुल्कवाढ करताना सरकारला अहवाल सादर करणे अनिवार्य असावे. शाळेसंदर्भातील निर्णयासंदर्भात मुख्याध्यापकांना दोषी धरले जाते. त्याऐवजी शाळा व्यवस्थापनाला दोषी धरण्यात यावे. शाळा व्यवस्थापनाप्रमाणेच विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे पालकांना दाद मागण्याची मुभा द्यावी, हे महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये पीटीए समिती निवड प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा पालक प्रतिनिधींनी मांडला. यापुढे प्रत्येक तुकडीतील एका पालकाची निवड शाळेच्या समितीत करावी, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आज आझाद मैदानात पालकांचे आंदोलनगेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत दरवर्षी खासगी शाळा भरमसाट शुल्कवाढ करतात. या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यासह मुंबईतील पालक एकवटले आहेत. रविवार, २१ मे रोजी आझाद मैदान येथे पालक एकत्र येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. शुल्कवाढ नियंत्रण कायद्यानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेला दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्कवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, गेल्या कित्येक वर्षांपासून शाळा सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करत आहेत. दरवर्षी वारेमाप शुल्कवाढ करताना शाळा नवीन शक्कल लढवत असतात. पॅरेन्ट्स टीचर्स असोसिएशनला (पीटीए) न जुमानता दरवर्षी शुल्कवाढ केली जाते. दरवर्षीच्या या जाचाला कंटाळून विविध शाळांतील पालक गेल्या एक महिन्यापासून लढा देत आहेत.