शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

By admin | Updated: October 5, 2016 05:36 IST

येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल

पुणे : येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल. सध्या अस्तित्वात असलेले जलस्रोत टिकविणे आव्हानात्मक असणार आहे. हे जलस्रोत शाश्वत करण्यासाठी नवीन व्यवस्थापन धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी येथे केले.खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय जलस्रोत विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. अमरजित सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. सी. अग्रवाल, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा व्यासपीठावर उपस्थित होते. टपाल विभागाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’वर काढलेले तिकीट, तसेच संस्थेवरील कॉफी टेबल बुक आणि सरदार सरोवर प्रकल्पावरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. देशाला विविध घटकांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून अन्सारी म्हणाले की, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करण्याचे आव्हान आहे. अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी जलपुनर्प्रक्रियेतील अल्प गुंतवणूक आणि भूगर्भातील पाण्याचा होत असलेला बेसुमार उपसा, यामुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. देशातील अनेक नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवत जलसंचय, जलसिंचन, ऊर्जा निर्मिती करता येईल, अशा प्रकारच्या धरणांची रचना तयार करण्याचे आव्हान असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)