शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

By admin | Updated: October 5, 2016 05:36 IST

येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल

पुणे : येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल. सध्या अस्तित्वात असलेले जलस्रोत टिकविणे आव्हानात्मक असणार आहे. हे जलस्रोत शाश्वत करण्यासाठी नवीन व्यवस्थापन धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी येथे केले.खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय जलस्रोत विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. अमरजित सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. सी. अग्रवाल, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा व्यासपीठावर उपस्थित होते. टपाल विभागाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’वर काढलेले तिकीट, तसेच संस्थेवरील कॉफी टेबल बुक आणि सरदार सरोवर प्रकल्पावरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. देशाला विविध घटकांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून अन्सारी म्हणाले की, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करण्याचे आव्हान आहे. अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी जलपुनर्प्रक्रियेतील अल्प गुंतवणूक आणि भूगर्भातील पाण्याचा होत असलेला बेसुमार उपसा, यामुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. देशातील अनेक नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवत जलसंचय, जलसिंचन, ऊर्जा निर्मिती करता येईल, अशा प्रकारच्या धरणांची रचना तयार करण्याचे आव्हान असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)