शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे आव्हान

By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST

श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

पुणे : विज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास हा देशाच्या भविष्याचा ‘ट्रायपॉड’ आहे. श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.नटराजन एज्यूकेशन सोसायटी (एनइईस) आयोजित ‘एनइईस इनोव्हेशन अँवार्डस २०१५’ च्या वितरणसोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्हर्टो अ‍ॅँड असोसिएटसचे वरिष्ठ अधिकारी रमेश मिराखूर, दिनेश देव, डॉ. उमा गणेश आणि एनइईसचे प्रिन्सिपल विश्वस्त आणि झेंन्सार टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन उपस्थित होते. एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर थीम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला ३० हजार रुपयांचे द्वितीय व विद्या प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला २० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तंत्रज्ञानाशिवाय देशाला भवितव्य नसल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘आपल्या देशात ५५ टक्के तरूण असे आहेत, त्यांना ‘हे घडू शकत नाही’ किंवा ‘ही गोष्ट अशक्य आहे’ हेच मुळी मान्य नाही. त्यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक असून, सातत्याने नवीन काहीतरी करण्याची संधी ते शोधत असतात. जो खरा इनोव्हेटिव्ह असतो तो आपल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी पहात असतो. पण त्याची दृष्टी काहीसा वेगळा शोध घेत असते. खुल्या मनाने सर्व गोष्टींकडे आपल्याला पहाता आले पाहिजे. समस्यांपेक्षा त्याच्या उपायांचा विचार करता आला पाहिजे. देशाच्या लोकसंख्येनुसार १२५ कोटी मेंदू कार्यरत आहेत, त्यातून नक्कीच काहीतरी घडू शकते. इनोव्हेशन ही प्रयोगशाळेतच नव्हेतर कुठेही होऊ शकतात आणि हे काम तरूणांच्या हातूनच घडेल.’’ (प्रतिनिधी)४‘डिजिटल इनोव्हेशन फॉर इन्क्लूझिव्ह इंडिया’ या विषयावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आज देशातील जनतेला डिजिटली साक्षर करण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यात २० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लोकांना सहजरित्या माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक कागदाचे डिजिटलायझेशन होणे ही आता काळाची गरज बनली आहे, या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.