शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे आव्हान

By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST

श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

पुणे : विज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास हा देशाच्या भविष्याचा ‘ट्रायपॉड’ आहे. श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.नटराजन एज्यूकेशन सोसायटी (एनइईस) आयोजित ‘एनइईस इनोव्हेशन अँवार्डस २०१५’ च्या वितरणसोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्हर्टो अ‍ॅँड असोसिएटसचे वरिष्ठ अधिकारी रमेश मिराखूर, दिनेश देव, डॉ. उमा गणेश आणि एनइईसचे प्रिन्सिपल विश्वस्त आणि झेंन्सार टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन उपस्थित होते. एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर थीम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला ३० हजार रुपयांचे द्वितीय व विद्या प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला २० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तंत्रज्ञानाशिवाय देशाला भवितव्य नसल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘आपल्या देशात ५५ टक्के तरूण असे आहेत, त्यांना ‘हे घडू शकत नाही’ किंवा ‘ही गोष्ट अशक्य आहे’ हेच मुळी मान्य नाही. त्यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक असून, सातत्याने नवीन काहीतरी करण्याची संधी ते शोधत असतात. जो खरा इनोव्हेटिव्ह असतो तो आपल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी पहात असतो. पण त्याची दृष्टी काहीसा वेगळा शोध घेत असते. खुल्या मनाने सर्व गोष्टींकडे आपल्याला पहाता आले पाहिजे. समस्यांपेक्षा त्याच्या उपायांचा विचार करता आला पाहिजे. देशाच्या लोकसंख्येनुसार १२५ कोटी मेंदू कार्यरत आहेत, त्यातून नक्कीच काहीतरी घडू शकते. इनोव्हेशन ही प्रयोगशाळेतच नव्हेतर कुठेही होऊ शकतात आणि हे काम तरूणांच्या हातूनच घडेल.’’ (प्रतिनिधी)४‘डिजिटल इनोव्हेशन फॉर इन्क्लूझिव्ह इंडिया’ या विषयावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आज देशातील जनतेला डिजिटली साक्षर करण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यात २० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लोकांना सहजरित्या माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक कागदाचे डिजिटलायझेशन होणे ही आता काळाची गरज बनली आहे, या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.