शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची निवड

By admin | Updated: November 6, 2014 04:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली.

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन आयएएस सचिवांची निवड बुधवारी पूर्ण केली. आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून अथवा सचिव म्हणून काम न केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या कार्यालयात घेतले आहे. विशेष म्हणजे या निवडीमागे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची मोठी भूमिका राहिली आहे.कोणते अधिकारी निवडायचे, त्यांची पार्श्वभूमी काय असे प्रश्न क्षत्रिय यांना विचारण्यात आले होते. क्षत्रिय यांनी राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्री आस्थापनेवरील सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडी करण्यातील अडथळे दूर झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री कार्यालयात कोणाला घ्यायचे यावरून मोठी खलबते झाली आणि अखेर प्रधान सचिव म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. परदेशी हे मूळ सोलापूरचे असून माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे जावई आहेत. लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. लातूरच्या भूकंपाच्या वेळी त्यांचे काम लक्षात राहीले होते. वनविभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. ई-गव्हर्नन्सबाबत आग्रही असलेले परदेशी यांचे यापूर्वीचे काम पाहून त्यांना ही संधी दिली गेली. नितीन गडकरी यांनीही परदेशींना त्यांच्या कार्यालयात घेतले होते पण राज्य सरकारने परवानगी न दिल्याने ते परत आले होते. परदेशी हे १९८५ च्या बॅचचे असून ते एम़टेक झालेले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून मिलिंद म्हैसकर काम पाहाणार आहेत. ते याआधी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. मूळचे सोलापूरचे असणाऱ्या म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा या देखील आयएएस अधिकारी असून, त्या मूळच्या नागपूरच्या आहेत. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागात ते सचिव होते. ‘लोकमत’ने उघड केलेल्या जीवनदायी घोटाळ्यानंतर त्यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर देखील नेमण्यात आले होते. मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. म्हैसकर यांनी मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनीअरिंग केले आहे.प्रवीण दराडे हे तिसरे सचिव म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत राहतील. त्या आधी ते नागपूरला अनेक वर्षे जिल्हाधिकारी, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आदी पदावर कार्यरत होते. मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या मतभेदाचा फटका त्यांना बसला व त्यांना अपारंपरिक ऊर्जा विभागात ‘नीरा’ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले होते. त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले सख्य झाले होते. दराडे हे १९९८च्या बॅचचे असून, त्यांनी एमए इकॉनॉमिक्स केलेले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदावर देखील आयएएस अधिकारी नेमला आहे. मालिनी शंकर यांची तेथे नियुक्ती केली आहे.