मुंबई : गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रीमियम ट्रेन सोडल्या. पण या गाडय़ांचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने चाकरमान्यांनी या ट्रेनकडे अक्षरश: पाठ फिरवली. या तीनही ट्रेनला प्रवासी मिळत नसल्याने या विशेष ट्रेन बंद करण्याची धमकीच कोकण रेल्वेकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर्पयतच्या आकडेवारीनुसार, शताब्दी ट्रेन 4,635 तिकिटे, एसी डबल डेकरची 8,640 तिकिटे, एसी आरक्षित ट्रेनची 1,330 तिकिटे उपलब्ध आहेत. कमी प्रतिसाद मिळत असल्याने या तिन्ही ट्रेनच्या फे:या मागे घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. रत्नागिरी-एलटीटी विशेष ट्रेन सोडण्यात आली. मात्र या ट्रेनला येताना केवळ 125 प्रवासी, तर जाताना केवळ 282 प्रवासी मिळाले. कमी प्रतिसादामुळे 1 सप्टेंबरपासून ही ट्रेन बंद करण्यात येणार आहे.