शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने शेतमालाची आधारभूत किंमत वाढवावी

By admin | Updated: July 22, 2014 19:24 IST

केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी केली.

अकोला: केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते देशमुख यांनी केला.

राज्य सरकारने केंद्र सरकाराला कापूस- ६ हजार ५0५, सोयाबीन- ३ हजार ९९५, गहू- २ हजार ७७५, हरभरा-३ हजार ८७७, तूर-४ हजार ९६२, धान २ हजार ७७0, ज्वारी- २ हजार ३६८, मूग-४ हजार ९६२ आणि उडीदची आधारभूत किंमत ६ हजार १0 रुपये करावी, अशी शिफारस केली होती. मात्र केंद्राने कापसाची ४ हजार ५0, सोयाबीन-२ हजार ५६0, गहूू-१ हजार ४00, भुईमूग-४ हजार, तूर-४ हजार ३५0, धान-१ हजार ३६0, ज्वारी-१ हजार ५३0,मूग- ४ हजार ६00 आणि उडीदची आधारभूत किंमत ४ हजार ३00 रुपये जाहीर केली आहे. गत वर्षभरात उत्पादन खर्च १५ ते १६ टक्क्यांनी वाढला असून, केंद्र सरकारने आधारभूत किंमत केवळ १ ते २ टक्केच वाढविल्या आहेत. वाढती महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील जनतेचा मोदी सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली.